घरमहाराष्ट्रहायकोर्टाच्या निर्णयानुसार जरंडेश्वर कारखान्याची विक्री

हायकोर्टाच्या निर्णयानुसार जरंडेश्वर कारखान्याची विक्री

Subscribe

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामा राजेंद्र घाटगे यांनी सातार्‍यातील जरंडेश्वर साखर कारखाना जप्त केला. यानंतर अजित पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. जरंडेश्वर कारखाना माझ्याच नातेवाईकांचा आहे. हा साखर कारखाना संचालक मंडळाने विकलेला नसून हायकोर्टाच्या निर्णयानुसार विक्री करण्यात आल्याचे अजित पवार यांनी सांगितले. अजित पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत या प्रकरणावर सविस्तर प्रतिक्रिया दिली.

मुंबईमध्ये सुंदरबाग सोसायटीने २००७ मध्ये मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मुंबई हायकोर्टाने त्या साखर कारखान्यांना एक वर्षाची मुदत द्यायला सांगितली होती. साखर कारखान्यांना एक वर्षाची मुदत द्या अशी सूचना करण्यात आली होती. एका वर्षात जर त्यांनी रक्कम न भरता पैसे थकवले तर ते विक्रीला काढा, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने दिली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, कायदेशीर प्रक्रिया राबवून टेंडर काढून विक्री करण्यात आली. त्या १४ साखर कारखान्यांमध्ये जरंडेश्वर साखर कारखानादेखील होता. हा कारखाना विकत घेण्यासाठी १२ ते १५ कंपन्यांनी टेंडर भरले होते. पण यामधील सर्वात जास्त टेंडर ‘गुरू कमोडिटी’ या कंपनीने भरले होते. त्यांनी ६५ कोटी ७५ लाखांची बोली लावली आणि तो विकला गेला. अशाच प्रकारे वेगवेगळ्या कंपन्यांनी इतर साखर कारखाने विकत घेतले, असे अजित पवारांनी सांगितले.

- Advertisement -

गुरू कमोडिटीने विकत घेतलेला कारखाना तो बीव्हीजी ग्रुपचे हनुमंत गायकवाड आणि माने यांनी चालवण्यासाठी मागितला होता. असे अनेक कारखाने चालवायला दिले जातात; पण दुर्दैवाने त्यांना पहिल्याच वर्षी पाच कोटींचा तोटा झाला. ३० ते ३५ वर्षांसाठी त्यांनी कारखाना चालवण्यासाठी घेतला होता. जरंडेश्वर शुगर मिल नावाने त्यांनी जी कंपनी सुरू केली होती ती नंतर माझे नातेवाईक राजेंद्र घाडगे यांनी ती चालवायला घेतली. पण नंतरच्या काळातही तोटा झाला. नंतर रितसर परवानगी घेत त्याचा विस्तार करण्यात आला. यासाठी रितसर कर्ज घेण्यात आले असून ते फेडलेही जात आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

ईडीकडून गुरू कमोडिटीच्या संदर्भात काहीतरी चौकशी सुरू आहे. ती सुरू असताना कारखाना गुरू कमोडिटीच्या नावे असल्याने टाच आणली आहे. कारखाना गुरू कमोडिटीच्या नावे असला तरी जरंडेश्वर शुगर मिल चालवत आहे. त्यांच्यावर टाच का आणली याबाबत मी जास्त खोलात गेलो नाही. कारण त्या कंपन्यांशी माझा दुरान्वये संबंध नाही. ते ओमकार या व्यक्तीशी संबंधित ती कंपनी आहे. पण कारवाई झाली असल्याची गोष्ट खरी आहे. ईडीला चौकशीचा अधिकार आहे. मागे इतर अनेक संस्थांनी चौकशी केल्या असून त्यातून काही निष्पन्न झालेले नाही. जरंडेश्वर न्याय मागण्यासाठी संबंधित यंत्रणेकडे जाईल. अनेक शेतकरी आणि आणि कामगारांचं काम त्या कारखान्यावर अवलंबून आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

- Advertisement -

फक्त तीन कोटींचा हप्ता शिल्लक असताना कारखाना विकला

माजी संचालिका शालिनीताई पाटील यांचा आरोप

आमच्या जरंडेश्वर साखर कारखान्याचा कर्जाचा हप्ता भरण्यासाठी थोडा उशीर झाला होता. अवघ्या तीन कोटींचा हप्ता शिल्लक असताना त्यांनी कारखाना विकला. आमच्या अकाऊंटमध्ये ८ कोटी ३४ लाख जमा होते. त्यामुळे ते पैसे वळवण्याची विनंती करूनही दुर्लक्ष करण्यात आले. सरकारची आमच्या कर्जाला हमी होती. त्यामुळे सरकारकडे जाता आले असते; पण बँकेत खरेदी करणारे अजित पवार यांच्यामुळे आम्ही काहीही करू शकलो नाही. अजित पवारांनी सत्तेचा दुरूपयोग करत पुरेपूर गैरफायदा घेतला. त्यामुळे २५ हजार कोटींचा भ्रष्टाचार अजित पवारांच्या काळात झाला, असा आरोप जरंडेश्वर साखर कारखान्याच्या संस्थापिका आणि माजी संचालिक शालिनीताई पाटील यांनी केला आहे.

देवाच्या काठीला आवाज नसतो. शंभर अपराध भरले की फटका बसतोच अशी प्रतिक्रिया शालिनीताई पाटील यांनी दिली आहे. जरंडेश्वर साखर कारखान्याचा लिलाव झाला तेव्हा घाडगे यांनी हा कारखाना खरेदी केला होता. या संपूर्ण लिलाव प्रक्रियेला शालिनीताई पाटील यांनी न्यायालयात आव्हान दिले. पण आता ईडी चौकशीच्या निमित्ताने आता कारवाई केल्याने आम्हाला न्याय मिळाला अशीही प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. याआधी २०१९ मध्ये अण्णा हजारे, माणिकराव जाधव, अरोरा आणि शालिनीताई पाटील यांनी अर्ज केला. अरोरा यांनी नंतर माघार घेतली. त्यामुळे ईडीने या प्रकरणात एफआयआर दाखल केला. पण कारवाई न झाल्याने दुसर्‍यांदा अर्ज करण्यात आला. ईडीने आम्हाला पाठिंबा दिला. भ्रष्टाचार झाल्याचे त्यांनी मान्य केले. त्यामुळे एकूण २७ हजार सभासदांना न्याय मिळाल्याचेही शालिनीताई पाटील यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -