घरकर्नाटक विधानसभा निवडणूक २०२३Karnataka Election 2023 : मोदी-शाह खुळखुळे; संजय राऊतांची बोचरी टीका

Karnataka Election 2023 : मोदी-शाह खुळखुळे; संजय राऊतांची बोचरी टीका

Subscribe

 

मुंबईः मोदी-शहा ही खेळणी आहेत. हे खुळखुळे यापुढे निवडणुकीत चालणार नाहीत, अशी बोचरी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालानंतर केली. कर्नाटकात भाजपचा पराभव झाला आहे. तर कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. यावरुन महाराष्ट्रातही सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपली आहे.

- Advertisement -

दुसऱ्याच्या घरात मुलगा झाला तरी यांना आनंद होतो, अशी टीका भाजपने ठाकरे गटावर केली. त्याला संजय राऊत यांनी चोख उत्तर दिले. संजय राऊत म्हणाले, हो… आम्हाला आनंद झाला आहे. सर्वसामान्य जनतेने हुकुमशाहाची मस्ती उतरवली आहे. आम्ही कर्नाटकामधील सर्वसामान्य जनतेचे अभिनंदन करायला पेढे वाटत आहोत. तुम्ही काय केलंत. तुम्ही गेलात ना कर्नाटकमध्ये भाजपचा प्रचार करण्यासाठी. तुम्ही बेळगावमधील मराठी माणसांच्याविरोधात प्रचार केलात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार केलेला भाजपचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. देवेंद्र फडणवीस यांनी विरोधात प्रचार केल्यानेच महाराष्ट्र एकीकरण समितीचा एकही आमदार निवडून आलेला नाही. याचे खापर मी फडणवीस यांच्यावरच फोडतो, असा आरोप खासदार राऊत यांनी केला.

ईडी, सीबीआय, आयटी अशा भाजपच्या धमक्यांना न जुमानता कॉंग्रेस कर्नाटकमध्ये निवडणुकांसमोरे गेली. त्यामुळे कॉंग्रेसचा विजय झाला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणतात कर्नाटक निकालाचा महाराष्ट्र आणि देशावर परिणाम होणार नाही. मात्र देखणा हिरा भंगला, अशी फडणवीस यांची अवस्था झाली आहे. मी पैजेवर सांगतो की कर्नाटक निकालाचा महाराष्ट्र आणि देशावर नक्कीच परिणाम होणार आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

- Advertisement -

संजय राऊत म्हणाले, बजरंगबली सत्याच्या बाजूने उभा राहिला आहे. कर्नाटक विजयाची गदा राहुल गांधी यांच्या हाती आहे. राहुल गांधी हे २०२४ च्या निवडणुकीत पंतप्रधानपदाचा चेहरा असू शकतात. आम्ही सर्व एकत्र आहोत. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत भाजपचा पराभव निश्चित आहे. कर्नाटकामध्ये झालेला सत्ता बदल हा केंद्रातील भाजप सरकार जाणार यांची नांदी आहे. परिणामी कर्नाटक जनतेचे आभार मानायलाच हवेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले होते की कर्नाटकात भाजपचा पराभव झाला तर दंगली उसळतील. निवडणुकीच्या निकालानंतर जनता आनंद साजरा करत आहे. याचा तरी आता भाजपने बोध घ्यायला हवा. देशातील मोजकी राज्य सोडली तर भाजपकडे काहीच नाही. यापुढे जनता भाजपला सत्ता देणार नाही, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -