घरताज्या घडामोडीमी कृषीमंत्री असताना पिकाला योग्य भाव देत होतो - शरद पवार

मी कृषीमंत्री असताना पिकाला योग्य भाव देत होतो – शरद पवार

Subscribe

तोडणीचा खर्चही निघत नसून शेतकरी पीक फेकून देत आहेत.

पिकाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी पीक फेकून देत असल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकर्‍यांच्या संतापाचा उद्रेक होत असून या निमित्ताने माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. माझ्याकडे कृषी खाते असताना शेतकर्‍यांच्या पिकाला योग्य भाव देत होतो, असे शरद पवारांनी सांगितले आहे. मात्र, सध्या लक्ष दिले जात नसल्याचे सांगत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

सहकार महर्षी माजी आमदार स्वर्गीय शिवाजीराव महादेव तथा दादासाहेब काळे पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि शेतकरी मेळाव्यानिमित्त शरद पवार उपस्थित होते. जुन्नरमधील या कार्यक्रमाला गृहमंत्री दिलीप वळसे-पाटीलदेखील उपस्थित होते. यावेळी बोलताना शरद पवारांनी शेतकर्‍यांचा मुद्दा उपस्थित केला.

- Advertisement -

तोडणीचा खर्चही निघत नसून शेतकरी पीक फेकून देत आहेत. कांद्याचा खर्चही निघत नसून अन्य गोष्टींनाही किंमत मिळत नाहीये. माझ्याकडे १० वर्षीय केंद्रीय कृषी खाते होते. शेतकर्‍याच्या मालाला योग्य भाव देणे यावेळी मी कटाक्षाने पाळले. यामुळे शेतकरी या देशाची भूक भागवतोच. मात्र, संपूर्ण जगाला अन्नधान्य पुरवण्याची कामगिरी करू शकतो. शेतकर्‍यांनी हे करून दाखवले आहे, असे शरद पवारांनी यावेळी सांगितले. पण दुर्दैवाने केंद्र सरकारमध्ये यासंदर्भात गरज आहे तितके लक्ष दिले जात नाही आहे. त्यामुळे शेतमालाच्या किमती घसरताना दिसत आहे, असा आरोपही यावेळी शरद पवारांनी केला.

जुन्नरच्या हापूस आंब्याची एक वेगळी ओळख वाढली याचा अभिमान यासोबत येथील भाजीपाला खराब होऊ नये यासाठी कोल्ड स्टोरेजची व्यवस्था केली तर शेतकर्‍यांना या नुकसानीतून वाचविता येईल, असा सल्ला पवार यांनी मार्केट कमिटीला दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -