घरमहाराष्ट्रपवारांच्या तिसर्‍या पिढीचं ठाकरेंना आव्हान

पवारांच्या तिसर्‍या पिढीचं ठाकरेंना आव्हान

Subscribe

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'सामना' या मुखपत्राच्या आग्रलेखामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अजित पवार यांच्यावर टिका केली. या टिकेनंतर शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी ठाकरेंना आव्हान दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार राजकारणात सक्रीय होऊ पाहत आहेत. त्यांनी आता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली आहे. त्यामुळे रोहित पवार सध्या चर्चेत आहेत. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांच्यावर मोठ्या प्रमाणात टिका केली. त्यावर राष्ट्रवादीकडून किंवा अजित पवार यांच्याकडून कोणतेही उत्तर आलेले नसले तरी शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले रोहित?

“आमच्या उद्धवला सांभाळा, असं बाळासाहेब ठाकरे अखेरच्या क्षणी का म्हणाले होते याचा अर्थ आता समजला. संपादकीय लिहिण्याऐवजी दोन ओळीचा राजीनामा लिहिला असता तर वडिलांप्रमाणे आपल्याला ताठ कणा आहे हे महाराष्ट्राला पाहायला मिळालं असतं,”असं रोहित पवार यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे.

- Advertisement -

वाचा – जलयुक्त शिवारचे ७.५ हजार कोटी गेले कुठे – अजित पवार

काय लिहिले उद्धव यांनी ‘सामना’मध्ये

२४ ऑक्टोबर रोजी जालना येथील एका कार्यक्रमात अजित पवार यांनी अयोध्येत राममंदिर उभारण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेवरुन उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. यावेळी अजित पवार म्हणाले होते की, ‘पाच वर्षांमध्ये बापाचं स्मारक बांधता आलं नाही ते राम मंदिर काय बांधणार?’ हे विधान उद्धव यांना जिव्हारी लागल्याचे पहायला मिळाले. पवारांच्या या विधानाचे पडसाद ‘सामना’त उमटले. सामनाच्या आग्रलेखात म्हटले आहे की, ‘अजित पवार या माणसाला महाराष्ट्राच्या राजकारणात काडीमात्र किंमत नाही. काकांच्या पुण्याईने व कृपेनेच ते तरले आहेत. हे महाशय अधूनमधून शेतकऱ्यांचे प्रश्न, दुष्काळी परिस्थिती यावर त्यांच्या ‘मुतऱ्या’ थोबाडाने बोलत असतात’, अशा शब्दांत उद्धव यांनी अजित पवारांचा समाचार घेतला होता.

- Advertisement -

वाचा – गरळ ओकण्यापेक्षा बाळासाहेबांचे स्मारक बांधा; अजित पवारांचा पलटवार

रोहित यांची फेसबुक पोस्ट काय?

सामनाचा आग्रलेख शरद पवारांच्या नातवाला चांगलाच लागला असल्याचे त्यांच्या फेसबुक पोस्टमधून दिसून आले. त्यामुळे रोहित यांनी फेसबुक पोस्ट लिहिली की, ”बाळासाहेब अखेरच्या क्षणी म्हणाले होते, आमच्या उद्धवला सांभाळा! त्या सांभाळाचा अर्थ काल समजला, त्याचा अर्थ आमचा मुलगा अल्लड आहे त्याला सांभाळून घ्या असाच असावा.

बाळासाहेब हुशार होते, भाषेवर प्रभुत्व असणारे मोठ्ठे नेते होते. मार्मिक असो कि सामना त्यांनी टिका देखील जहाल केली, पण त्यांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी गरळ ओकून त्यांच्याच लेखणीचा अपमान केला.

उद्धव ठाकरे कधी लोकांच्यातून निवडून आले नाहीत की मातोश्रीच्या बाहेर पडून उभा महाराष्ट्र पाहण्याचं देखील साधं कष्ट घेतलं नाही. महाराष्ट्र जळत असताना हे महाशय सत्तेत भागीदार होवून सर्वसामान्यांना भुलवण्याचं काम करत आहेत.

इतका लेख लिहण्याच्याऐवजी दोन ओळींचा राजीनामा दिला असता तरी आपल्या वडिलांप्रमाणे आपला ताठ कणा महाराष्ट्राला पहायला मिळाला असता.

वाचा – मराठा आणि कोरेगाव-भीमा आंदोलकांवरील खटले मागे घेण्याची तयारी सुरू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -