घरमहाराष्ट्रएसटी-चारचाकीच्या अपघातात चौघांचा मृत्यू

एसटी-चारचाकीच्या अपघातात चौघांचा मृत्यू

Subscribe

शिर्डीला जात असताना एसटी-चारचाकीच्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत एसटीने जागीच पेट घेतला आहे.

शिर्डी महामार्गावर शुक्रवारी रात्री एसटी व चारचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे चौघेही कोपरगावचे रहिवासी होते. मृतांमध्ये सोनू चिने (३०), आकाश पाटील (२६), पंकज वाळूंज (२८) व सौरभ थोरात (३०) यांचा समावेश आहे. पांगरी शिवारात बाबा ढाब्याजवळ ही दुर्दैवी घटना घडली. दरम्यान अपघातानंतर एसटी बसने पेटही घेतला. या प्रकरणी पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे. दरम्यान पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.

शिर्डीला जात असताना झाला अपघात

सदर चार तरुण आय २० कारने नाशिकहून शिर्डीकडे जात होते. दरम्यान पांगरी शिवाराजवळ समोरून येणा-या शिर्डी-मुंबई निमआराम एसटी बसची समोरून धडक झाली. यात चारचाकीचा चक्काचूर झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी मदतकार्य सुरू केले. मात्र तोपर्यंत चौघांचा मृत्यू झाला होता. चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सिन्नरच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. दरम्यान कोपरगावात शोककळा पसरली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -