घरमहाराष्ट्ररावसाहेब दानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा - नवाब मलिक

रावसाहेब दानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा – नवाब मलिक

Subscribe

भाजपाचे केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे कायदा तोडण्याचा सल्ला देत असून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करुन अटक करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी केली आहे. केंदीय मंत्री रावसाहेब दानवे हे कायदा तोडण्याचा सल्ला आणि प्रोत्साहन देवून लोकांच्या भावनेशी खेळत आहेत. त्यामुळे पोलिसांनी या मंत्र्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि अटक करावी असेही नवाब मलिक म्हणाले.

मी असेपर्यंत खुशाल गायी कापा, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले होते. जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे प्रचार करत असताना दानवे यांनी हे वक्तव्य केले आहे. धक्कादायक म्हणजे केंद्र सरकारने गोवंश हत्या बंदीचा कायदा केलेला असतानाच खुद्द केंद्रीय मंत्र्यांनेच हे वक्तव्य केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दि. १९ ऑक्टोबर रोजी रावसाहेब दानवे यांनी कठोरा बाजार येथे मुस्लिम समाजासमोर भाषण केले होते. या भाषणाची क्लिप आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यामध्ये लक्ष घालून अशा मंत्र्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केल. एका बाजूला गोहत्येच्या नावावर मुस्लिम समाजाच्या विरोधात मॉबलिचिंगचे प्रकार घडत आहेत. दुसरीकडे मतांसाठी गोहत्या करा, असं मुस्लिम समाजाच्या लोकांना सांगायचं. असे मंत्री केंद्रात असतील तर देशात काय सुरु आहे? हे लक्षात येते असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर रावसाहेब दानवे यांनी एक निवेदन काढून या आपण असे वक्तव्य केले नसल्याचे सांगितले आहे. कुणीतरी व्हिडिओमध्ये छेडछाड करुन क्लिप व्हायरल केली असल्याचा आरोप देखील दानवे यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -