घरताज्या घडामोडीपिल्लांवर कुऱ्हाडीने घाव, आईने घेतला असा बदला!

पिल्लांवर कुऱ्हाडीने घाव, आईने घेतला असा बदला!

Subscribe

बुलढाण्यात जिल्ह्यातील सोनाळा वनपरिक्षेत्रामध्ये अस्वलाच्या 2 लहान पिल्लांना कुणीतरी कुर्‍हाडीने वार करून ठार केले. हे अस्वलाला कळताच तीने जंगलात गेलेल्या दोघा इसमांवर हल्ला करून त्यांना ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या आलेवाडी शिवारामध्ये अशोक मोतीराम गवते आणि माना बंडू गवते हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे गावात क्षेत्रातील आलेवाडी नियत क्षेत्रामध्ये गेले असता त्यांच्यावर एका अस्वलाने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

अस्वलाने केलेला हल्ला अतिभय भीषण होता, अस्वलाने त्या व्यक्तीचा चेहरा पुर्णपणे छिन्न- विच्छिन्न केला होता. हे अतिशय चिडलेलं होतं कारण, घटनास्थळाचा १५ ते २० फुटावर जवळच अस्वलाची २ आठ महिन्यांच्या पिल्लांवर कुऱ्हाडीने वार करून ठार केल्याच्या अवस्थेत होते. यामुळेच मादा अस्वलाने जंगलात गेलेल्या व्यक्तींवर हल्ला चढवण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -

अस्वलीने दोन जणांवर हल्ला करून ठार मारल्यामुळे आलेवाडी शिवारातील नागरिकांमध्ये भितेचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी वनविभागाने घटनास्थळी धाव घेईन गुन्हा दाखल केला आहे.


हे ही वाचा – UP : मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान बॉम्बने उडवण्याची धमकी, सुरक्षेत वाढ!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -