घरठाणेअडीच वर्षात किती प्रकल्प बाहेर गेले याची माहिती जाहीर करणार - उद्योग...

अडीच वर्षात किती प्रकल्प बाहेर गेले याची माहिती जाहीर करणार – उद्योग मंत्री उदय सामंत

Subscribe

डोंबिवली – गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रातून किती प्रकल्प बाहेर गेले? याची माहिती घेवून उद्या मी यादीच जाहीर करणार असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. आदित्य ठाकरे यांनी बुधवारी पुन्हा एक पत्रकार परिषद घेवून रायगडमधील बल्क ड्रग पार्क प्रकल्प देखील बाहेर जात असल्याची टिका केली होती. यावर सामंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

सर्टर्डे क्लबतर्फे इंजिनिअर डे निमित्त डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले कलामंदिरात राज्य स्तरीय उद्योजकता परिषदेचे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेस उद्योग मंत्री सामंत हे उपस्थित होते. यावेळी बोलताना येणाऱ्या वर्षभरात महाराष्ट्रातील मराठी उद्योग दीड लाख रोजगार उपलब्ध करुन देणार आहे. त्याला राज्य सरकारही  मदत करणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

- Advertisement -

मुख्यमंत्री रोजगार योजनेतंर्गत कर्ज मागणाऱ्या युवा पिढीच्या उद्योजकांची कर्ज प्रकरणी झिरो रिजेक्शन तत्वावर मंजूर करण्यात यावी. त्यांची बँकाकडून हॅरासमेंट करण्यात येऊ नये. त्यांची हॅरासमेंट केल्याचे आढळून आल्यास संबंधित बँकांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही सामंत यांनी दिला.

डोंबिवलीतील १५६ कारखाने स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याविषयी उद्योग मंत्री सामंत यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले की, तत्कालीन सरकारमधील मंत्र्यांनी जो निर्णय घेतला आहे. त्याविषयी उद्योजक संघटनेशी चर्चा करुन त्यावर बैठक घेतली जाईल. चर्चा करुन निर्णय घेतला जाईल. त्याचबरोबर डोंबिवली एमआयडीसीबाबत वारंवार प्रदूषणाच्या घटना घडतात, त्यावर उद्योजक आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यासोबत या भागाचा येत्या आठ दिवसात  दौरा केला जाईल. प्रदूषण होऊ नये यासाठी सूचना केली जाईल. वारंवार सांगूनही उद्योजक ऐकणार नसतील तर परिस्थिती पाहून कारवाई केली जाईल, असे उद्योग मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

हेही वाचा : लावणीसम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर यांचे वृद्धापकाळाने निधन


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -