घरताज्या घडामोडी'मी खंजीर खुपसलाय म्हणताय, मग राष्ट्रवादीने काय खुपसलं होतं?', उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना सवाल

‘मी खंजीर खुपसलाय म्हणताय, मग राष्ट्रवादीने काय खुपसलं होतं?’, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना सवाल

Subscribe

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आवाज कुणाचा या पॉडकास्ट माध्यमातून सामनाला प्रदीर्घ मुलाखत दिली. उद्धव ठाकरे यांची मुलाखत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी राजकीय घटनांवर वक्तव्य करत ठाकरी भाष्य केलं. दरम्यान, मी खंजीर खुपसलाय म्हणताय, मग राष्ट्रवादीने काय खुपसलं होतं? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुलाखतीच्या माध्यमातून विचारला आहे.

…मग राष्ट्रवादीने काय खुपसलं होतं?

देवेंद्र फडणवीस म्हणताहेत की, उद्धव ठाकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला, यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, ठीक आहे. मग राष्ट्रवादीने काय खुपसलं होतं, की ज्यामुळे तुम्ही राष्ट्रवादी फोडलीत. शिवसेनेने खंजीर खुपसला, मी खंजीर खुपसला असं म्हणताय, मग राष्ट्रवादीने काय खुपसलं होतं? तुम्ही त्यांना पण फोडलंत. शिवसेना फोडून तुमचं सरकार आलं होतं ना? शिवाय अपक्षही सोबत घेऊन तुमचं सरकार मजबूत झाल्यानंतरही पुन्हा राष्ट्रवादी का फोडलीत? बरं, राष्ट्रवादी फोडण्याच्या आधी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे भयंकर आरोप चार ते पाच दिवस पीएम मोदींनी केले होते. त्या आरोपांचे आता काय झाले. त्या घोटाळ्याच्या पैशांचं आता काय झालं? कशासाठी ही फोडाफोडी केलीत? म्हणूनच म्हटलं की, एवढा भ्रष्टाचारी राष्ट्रवादी पक्ष आहे किंवा होता तर त्यांनी नेमकी तुमच्याशी काय गद्दारी केली होती की त्यांनाही तुम्ही फोडलंत? असे अनेक सवाल उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना विचारले आहेत.

- Advertisement -

ती आमची कुटनीती?

ही कुटनीती आहे की, आधीपासूनची मेतकूट नीती आहे हे माहिती नाही मला, पण या कुटनीतीला आता कुटून टाकण्याची वेळ आली आहे. सत्तालोलुपता, सत्ताभक्षक हाच शब्द मला योग्य वाटतो. जसा नरभक्षक असतो. तसे हे सत्ताभक्षक आहेत. हे एकदा का सत्तेला चटावले की, त्यांना काही दिसेनासे होऊन जाते.महिलांवरील अत्याचार त्यांना दिसेनासे झाले आहेत. वाढती महागाई यावर तर काही बोलूच नका, हे विषय त्यांच्या लेखनी काहीच नाहीयेत आणि एका खोट्या भ्रमात सत्ता चालवत आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

ज्यांना आपण आपलं मानतो ती बांडगुळं निघतात

काही वेळा आपली फसगत होते. ज्यांना आपण आपलं मानतो ती बांडगुळं निघतात. तरीदेखील ती आपल्यासोबत आहेत असं आपल्याला वाटत राहतं, पण प्रत्यक्षात ती त्या फांदीवरती मूळ वृक्षाचा रस शोषत असतात. वृक्षाला वाटतं, हे आपल्याच सोबत आहेत, असं म्हणत ठाकरेंनी शिंदे गटावर टीका केली.

- Advertisement -

धनुष्यबाण की मशाल?

निवडणूक आयोगाचं काम हे निवडणूक निशाणी किंवा चिन्ह देण्याचं आहे. पक्षाचं नाव देण्याचं किंवा पक्षाचं नाव बदलण्याचं नाही. म्हणून आता जो विचित्र निकाल निवडणूक आयोगाने दिलेला आहे. त्याविरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात गेलोय आणि मला खात्री आहे की, ज्या पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडताना ज्या गोष्टींची पूर्तता करण्याची आवश्यकता होती. त्या सर्व गोष्टींची पूर्तता आपण केली आहे आणि ती पूर्तता केल्यामुळेच मला खात्री आहे की, ‘शिवसेना’ हे नाव आपल्याला पुन्हा मिळेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘एनडीए’ नावाचा अमिबा

बऱ्याच वर्षांनंतर या देशात ‘एनडीए’ नावाचा काहीतरी अमिबा जिवंत आहे हे कळलं आणि आपण जे देशभक्त राजकारणी आहोत त्यांची ‘इंडिया’ नावाची एक आघाडी केलेली आहे त्याला उत्तर देण्यासाठी त्याच दिवशी आपल्या माननीय पंतप्रधानांनी एकदम आपल्या आठवणीतल्या गोष्टी बाहेर काढल्या आणि छत्तीस पक्षांची जेवणावळ त्यांनी घातली. खरं म्हणजे, छत्तीस पक्षांची त्यांना गरज नाहीये. त्यांच्या ‘एनडीए’मध्ये आता ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय हे तीनच पक्ष मजबूत आहेत. जी मनानेच विकली गेली आहेत. ती माणसं मला नकोच आहेत. जी माझ्या सभोवती अगदी मूठभर का असतील, पण निष्ठावान असतील अशीच माणसं मला हवीत. कारण तीच खरी शक्ती असते.

पसाभर गद्दार घेऊन फिरण्यापेक्षा मूठभर निष्ठावंत मला नेहमीच आवडतात.शिवसेना मजबूत होतीच, पण आता अडीच वर्षांत मी जे काही करू शकलो. त्याच्यामुळे महाराष्ट्रातली जनता मला त्यांच्या कुटुंबातील सदस्य मानायला लागली. ही माझी कमाई आहे. मोठी कमाई आहे. त्या एका नात्याने शिवसेनेसोबत पूर्वी कधीही नव्हते असे लोकही, अशी जनताही शिवसेनेसोबत जोडली गेली, असंही ठाकरे म्हणाले.


हेही वाचा : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी; कोल्हापूरातील राधानगरी धरण भरले


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -