दुष्काळी उपाय योजनांबाबत अधिकारी येत नाहीत मिटिंगांना येत नाहीत अशा प्रकारची हतबलता गिरीष महाजन यांनी नाशिकमध्ये व्यक्त केली. सरकारच्या मंत्र्यांच जर अधिकारी ऐकत नसतील आणि उपाय योजना आचारसंहितेच्या नावाखाली दाबून टाकल्या जात असतील. तर किसान सभा आणि शेतकऱ्यांना याच्या बाबत गांभिऱ्याने विचार करावा लागणार आहे, असे मतं किसान सभेचे समन्वयक डॉ. अजित नवले यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून मांडले आहे. शिवाय राज्यातील दुष्काळजन्य परिस्थिती, चारा छावण्या, पाणी टंचाई या विषयांवरही त्यांनी भाष्य केले आहे. शिवाय सरकारने शेतकऱ्यांच्या समस्येकडे गांभिर्याने लक्ष दिले नाही तर राज्यात तीव्र उद्रेक करू, असा इशाराही त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून दिला आहे.
पाहा संपूर्ण व्हिडिओ :-
- Advertisement -