मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. परंतु यावर अजित पवारांनी स्पष्टीकरण देत या सर्व विषयांना पूर्णविराम दिलं. मात्र, आगामी काळात २०२४ मध्ये लोकसभेसह अनेक निवडणुका पार पडणार आहे. दरम्यान, २०२४ मध्ये भाजपच्या जागा घटणार असल्याचा अहवाल भाजप नेते विनोद तावडे यांच्या समितीने केंद्रीय नेतृत्वाला दिल्याचं सांगितलं जात आहे. या अहवालामुळे भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, या सर्व प्रकरणावर विनोद तावडे यांनी ट्वीट करत स्पष्टीकरण दिलं आहे.
काय आहे विनोद तावडेंचं ट्वीट?
दिवसभर माध्यमांद्वारे मी कोणता तरी अहवाल सादर केला आहे ज्यात राज्यात भाजपाची ताकद कमी झाल्याचा दावा केला जात आहे. असा कोणताही अहवाल मी सादर केला नसून, भाजपाची शक्ती शिंदे -फडणवीस सरकार आल्यानंतर उलट वाढलीच आहे. पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात झालेल्या विकासामुळे महाराष्ट्रात भाजपा अधिक मजबूतच झाली आहे, असं स्पष्टीकरण ट्विटद्वारे विनोद तावडे यांनी दिलं आहे.
दिवसभर माध्यमांद्वारे मी कोणता तरी अहवाल सादर केला आहे ज्यात राज्यात भाजपाची ताकद कमी झाल्याचा दावा केला जात आहे. असा कोणताही अहवाल मी सादर केला नसून, भाजपाची शक्ती शिंदे – फडणवीस सरकार आल्यानंतर उलट वाढलीच आहे. पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात झालेल्या विकासामुळे महाराष्ट्रात…
— Vinod Tawde (@TawdeVinod) April 18, 2023
विनोद तावडेंच्या अहवालात काय?
येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या जागा घटणार असा अहवाल समोर आला आहे. विनोद तावडे यांच्या समितीने हा अहवाल दिला आहे. २०१९ च्या तुलनेत आगामी निवडणुकीच्या काळात भाजपच्या जागा घटणार असून भाजपला महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटकात देखील धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा : नंदुरबारमधील ट्रॅक्टरच्या शोरुमला भीषण आग; 20 ट्रॅक्टर्स जळून