घरमहाराष्ट्र"शिंदे गटाबद्दल भाजपाला इतका राग का?" सचिन सावंतांचा प्रश्न

“शिंदे गटाबद्दल भाजपाला इतका राग का?” सचिन सावंतांचा प्रश्न

Subscribe

रविवारी ठाकरे यांनी त्यांच्या भाषणामध्ये महाकवयित्री बहिणाबाई यांच्या कवितेच्या ओळी ऐकवल्या पण त्यावरून भाजपकडून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली. पण त्यांच्या या टीकेवर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत बंड केले आणि पक्षचिन्हासहित शिवसेना नावावर देखील स्वतःचा हक्क मिळवला. पण त्यानंतर उद्धव ठाकरे कायमच यावरून शिवसेनेवर (शिंदे गट) टीका करताना पाहायला मिळतात. शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यामध्ये सुरू असलेला वाद नेहमीच टोकाला जाऊन पोहोचतो. रविवारी (ता. 23 एप्रिल) जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे ठाकरे गटाची जाहीर सभा पार पडली. या सभेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर (शिंदे गट) हल्लाबोल केला. रविवारी ठाकरे यांनी त्यांच्या भाषणामध्ये महाकवयित्री बहिणाबाई यांच्या कवितेच्या ओळी ऐकवल्या पण त्यावरून भाजपकडून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली. पण त्यांच्या या टीकेवर काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

भाजपने उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहीले आहे की, “उद्धवजी, तुम्ही पाचोऱ्यात आले. महाकवयित्री बहिणाबाई यांची कविता ऐकवली. पण तुमचं सगळंच सोयीस्कर आहे. ही कविताही तुम्ही तुमच्या प्रमाणे ऐकवली, अगदी सोयीस्कर! “जल्म्दात्याले भोवला त्याले लेक म्हणू नही..” पण तुम्ही पूर्ण कविता ऐकवली नाही, असे म्हणत भाजपने “‘इमानाले इसरला त्याले नेक म्हणू नही… जल्म्दात्याले भोवला त्याले लेक म्हणू नही’… ‘ज्याच्यामधी नाही भाव त्याले भक्ती म्हनु नही… ज्याच्यामधी नाही चेव त्याले शक्ती म्हणू नही'” असे ट्वीट करत टीका केली. पण भाजपचे हे ट्वीट रिट्वीट करत काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजपवर टीका केली.

- Advertisement -

सचिन सावंत यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, “उध्दवजींनी शिंदे गटाला उद्देशून सर्व ओळी म्हटल्या पाहिजे होत्या असे भाजपाचे मत आहे का? चांगला सल्ला आहे. पण शिंदे गटाबद्दल भाजपाला इतका राग का?” तर सचिन सावंत यांनी असा प्रश्न उपस्थित शिंदे-फडणवीस यांच्या युतीवर सुद्धा टीका केली असल्याचे बोलले जात आहे. तर सावंत यांनी अगदी योग्य प्रश्न उपस्थित केला असल्याचे नेटकऱ्यांकडून बोलले जात आहे.

- Advertisement -

एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदार शिवसेनेला आणि उद्धव ठाकरे यांच्या इमानाला विसरले असून ते तुमच्या सोबत असताना देखील तुम्ही शिंदे गटाबद्दल इतका राग का करता? असा प्रश्न सचिन सावंत यांनी उपस्थित करत टीका केली आहे.


हेही वाचा – पुणे विद्यापीठात धुडगूस घालणाऱ्या अभाविप विद्यार्थ्यांवर काय कारवाई करणार? रोहित पवारांचा प्रश्न

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -