उल्हासनगरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञात टोळीने ४ ते ५ जणांवर जीवघेणा हल्ला केला आहे. उल्हासनगरच्या गायकवाडपाडामध्ये काल रात्री ही घटना घडली आहे. हल्ल्यामध्ये विलास गायकवाड, राम गायकवाड, रोहीत मोरे, उषा गायकवाड जखमी झाले आहेत. एकाची प्रकृती गंभीर असून सर्वांवर उपचार सुरु आहेत. हल्ला कोणी केला आणि का केला यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
सविस्तर बातमी थोड्याच वेळात…