घरदेश-विदेशCentral Railway : मध्य रेल्वेच्या सुरक्षा बलाने आठ महिन्यांत वाचवले 44 जीव 

Central Railway : मध्य रेल्वेच्या सुरक्षा बलाने आठ महिन्यांत वाचवले 44 जीव 

Subscribe

मुंबई : रेल्वे सुरक्षा बल (RPF) कर्मचारी रेल्वेच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी नेहमीच आघाडीवर  असतात आणि चोवीस तास जागरुक असतात. त्यामुळे नियमित कर्तव्य बजावताना इतर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीने रेल्वे सुरक्षा बलाने एप्रिल ते नोव्हेंबर 2023 या काळात रेल्वे प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत. (Central Railway Security force of Central Railway saved 44 lives in eight months)

हेही वाचा – BJP : काँग्रेसचे “हैं तैयार हम” अभियान नेमकं कशासाठी? भाजपाने विचारले पाच प्रश्न

- Advertisement -

मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी “मिशन जीवन रक्षक” या मोहिमेचा एक भाग म्हणून मध्य रेल्वेवर एप्रिल ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत स्वतःचा जीव धोक्यात घालून आतापर्यंत 44 लोकांचे प्राण वाचवले आहेत. या जीव वाचवणाऱ्या घटनांचे दृष्य काही छापिल आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये खूप लोकप्रिय झाले आणि विविध समाज माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. या 44 घटनांपैकी एकट्या मुंबई विभागात जीव वाचवणाच्या एकूण 21 घटनांची नोंद झाली आहे. भुसावळ विभागात 15, पुणे विभागात 4, नागपूर विभागात 2 आणि सोलापूर विभागात 2 जीव वाचवण्याच्या घटनांची नोंद झालेली आहे.

रेल्वे सुरक्षा बलाच्या या जवानांना प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेवरील गुन्हे, अतिरेकी हिंसाचार, ट्रेनच्या वाहतुकीत होणारा अडथळा, हरवलेल्या मुलांची सुटका तसेच रेल्वे मध्ये आणि रेल्वे परिसरात अंमली पदार्थ जप्त करणे, प्रवाशांचे सामान परत मिळवणे इत्यादी विविध सुरक्षा आव्हानांचा सामना करावा लागतो. त्यामुळे ते आपले लक्ष प्रवाशांच्या सुरक्षेवर केंद्रीत करून असतात.

- Advertisement -

हेही वाचा – अयोध्येचा सातबारा देखील उद्योगपतीला दिला जाईल – संजय राऊत

रेल्वे सुरक्षा बलाच्या सतर्कतेने बहुतेक प्रकरणांमध्ये अशा प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत. प्रवासी प्रवास करताना काहीवेळा निष्काळजीपणा करतात आणि धावत्या ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना धोका पत्करतात किंवा काही वेळेला विविध वैयक्तिक कारणांमुळे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या लोकांचा रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी जीव वाचवला आहे. एखाद्याचा जीव वाचवण्याच्या या कृतीमुळे रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांप्रती आनंद आणि कृतज्ञतामध्ये वाढ होत आहे. परंतु लोक काही केल्या सुधारणार नाही, त्यामुळे ट्रेन सुटण्याच्या वेळापत्रकाच्या अगोदर स्थानकावर पोहोचणे, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून चढू अथवा उतरू नये व आपला जीव धोक्यात घालू, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -