मुंबई – देशाच्या स्वातंत्र्याचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत यापुढे महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचारी फोनवर हॅलो न म्हणता वंदे मातरम् म्हणत संभाषणाला सुरुवात करतील, अशी घोषणा राज्याचे नवे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सुधीर मुनगंटीवार यांना चांगलेच सुनावले आहे.
जीतेंद्र आव्हाड काय म्हणाले –
सुधीर मुनगंटीवार यांनी वंदे मातरम म्हणण्यासंदर्भात आदेश जारी केला आहेत. त्यावरुन, आमदार जितेंद्र आव्हाड भडकले. भारतीय संस्कारांमध्ये नमस्कार आहे, अनेकजण जय भीम म्हणातात. पोलीस अधिकारी जय हिंद म्हणतात, कोणी सतश्रीअकाल म्हणेल. या देशात स्वातंत्र्य आहे, लोकांना मोकळा श्वास घेऊ द्या, तोही आता तुम्हाला विचारुन घ्यायचा का असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला.
तुम्हाल सुधीर मनगंटीवार म्हणायचे, सुधीर मुनगंटीवारजी म्हणायचे, सुधीरजी मुनगंटीवार म्हणायचे की सुधीर भाऊ म्हणायचे ते जाहीर करून टाका. आता, राज्यात आम्हाला या-या नावाने हाक मार, अशी लीस्टच जाहीर करून टाका.या देशाला स्वातंत्र्य मिळाले ते मोकला श्वास घेण्यासाठी, तो श्वास कुठून कसा घ्यावा हेही तुम्हीच ठरवणार का? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे.
हॅलो ऐवजी वंदे मातरमने सुरुवात –
वंदे मातरम् हे आपले राष्ट्रगान आहे. हा केवळ एक शब्द नसुन भारतीयांच्या भारतमाते विषयीच्या भावनांचे प्रतिक आहे. १८७५ मध्ये बंकीमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेले हे गीत त्याकाळात स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांना उर्जा देण्याचे काम करत होते. हे माते मी तुला प्रणाम करतो अशी भावना व्यक्त करत बंकीमचंद्रांनी मनामनात देशभक्तीचे स्फुल्लींग चेतविले. भारतीय मनाचा मानबिंदू असलेल्या या रचनेतील एकेक शब्द उच्चारताच देशभक्तीची भावना जागृत होते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आपण हॅलो हा विदेशी शब्द त्यागत त्याऐवजी शासकीय कार्यालयांमध्ये यापूढे वंदे मातरम् म्हणत संभाषण सुरु करणार आहोत, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.