‘सापांचा शिकार महाराष्ट्राचा गरूडचं करणार’, अशा जळजळीत शब्दात मनसेने भाजपच्या व्यंगचित्राला प्रत्युत्तर दिले आहे. भाजपने एका व्यंगचित्राच्या माध्यमातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली होती. ‘काय होतास तू? काय झालास तू?’, अशा शब्दात भाजपने राज ठाकरेंवर भाजपकडून टीका करण्यात आली होती. याच टीकेला मनसेचे प्रवक्ता अखिल चित्रे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अखिल चित्रे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन ही भाजपवर निशाना साधला आहे.
नेमकं काय म्हणाले अखिल चित्रे?
‘अंधकार हटणार..सूर्य उगवणार…या दूतोंडी सापांचा शिकार होणार..कोणीतरी सांगा रे ह्यांना या सापांचा शिकार महाराष्ट्राचा गरूड़चं करणार!’ असं अखिल चित्रे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. या ट्विटसोबत अखिल चित्रे यांनी एक फोटोदेखील शेअर केला आहे. या फोटोमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना सापाची उपमा देण्यात आली आहे.
अंधकार हटणार..
सूर्य उगवणार…
या दूतोंडी सापांचा शिकार होणार..@BJP4Maharashtra @bjpmaha
कोणीतरी सांगा रे ह्यांना,या विषारी सापांचा शिकार महाराष्ट्राचा गरूडचं करणार ! @mnsadhikrut @RajThackeray pic.twitter.com/EvsWl6sQr5— Akhil Chitre (@akhil1485) April 5, 2019
हेही वाचा – ‘काय होतास तू, काय झालास तू’ – भाजपाची ‘राज ठाकरे’ यांच्यावर टीका