घरमुंबई...तर अनधिकृत फेरीवाल्यांना १० हजारांचा दंड

…तर अनधिकृत फेरीवाल्यांना १० हजारांचा दंड

Subscribe

अनधिकृत फेरीवाल्याबाबत कठोर कारवाईचे धोरण आयुक्तांकडे मंजुरीसाठी

मुंबईत रस्ते, पदपथ, रेल्वे स्थानक परिसरात अनधिकृत फेरीवाला व्यवसाय करणार्यांना पालिकेच्या धाडीत आगामी काळात १२०० रुपये ( सध्याची दंड रक्कम) ऐवजी वाढत वाढत तब्बल १० हजार रुपयांपर्यंत हा दंड भरावा लागणार आहे. तसेच, वारंवार पकडल्यास त्या फेरीवाल्यांना ओळखपत्र जमा करावे लागणार आहे. त्याचप्रमाणे यापुढे रात्री दहा वाजेपर्यंत पालिकेकडून कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. मात्र याबाबतच्या सुधारित धोरणाला पालिका आयुक्तांनी मंजुरी दिल्यानंतरच कारवाई सुरू करण्यात येणार आहे.

भाजपचे नगरसेवक अभिजित सामंत यांनी, ९ जानेवारी २०२० ला विधी समितीच्या बैठकीत मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिकेने कडक कारवाईची मागणी केली होती. पालिका ज्याप्रमाणे नो पार्किंग मध्ये वाहन पार्क करणाऱ्यांकडून किमान ८ हजार ते १० हजार रुपयांचा दंड वसूल करते. मात्र रस्ते, पदपथ याठिकाणी अनधिकृत फेरीवाला व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना चाप लावण्यासाठी ठोस व कडक कारवाई करण्यात येत नसल्याने फेरीवाले कारवाईनंतरही पुन्हा पुन्हा त्याच त्याच ठिकाणी फेरीवाला व्यवसाय करतात. त्यामुळे सामान्य जनतेला रस्ते, पदपथ याठिकाणी चालायला त्रास होतो, त्यामुळे अशा फेरीवाल्यांना कायमचा चाप लावण्यासाठी पालिकेने कडक कारवाई करावी. त्यांनाही नो पार्किंग मधील वाहनांना ज्याप्रमाणे जबर दंड आकारण्यात येतो, त्याप्रमाणे जप्त माल सोडविताना त्यांना जास्तीत जास्त दंड करण्यात यावा.

- Advertisement -

तसेच, सदर फेरीवाला हा कोठे राहतो आणि तो वारंवार एकाच ठिकाणी बसतो का याची माहिती घेण्यासाठी त्याचे ओळखपत्र उदा. आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आदींची प्रत जमा करणे बंधनकारक करावे. तसेच फेरीवाले संध्याकाळ नंतर रात्री उशीरापर्यंत व्यवसाय करीत असल्याने त्यांच्यावर रात्री वाजेपर्यंत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अभिजित सामंत यांनी केली होती.

त्यावर, पालिका प्रशासनाने समाधानकारक उत्तर न दिल्याने सामंत यांनी, आज विधी समितीच्या बैठकीत ठिय्या आंदोलन करून जोपर्यंत सकारात्मक उत्तर दिले जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा हट्ट धरला. अखेर पालिकेने नमते घेत अनधिकृतपणे फेरीवाला व्यवसाय करणार्यांवर वरीलप्रमाणे धोरण बनवून कारवाई करण्याबाबत सकारात्मक उत्तर दिले. त्यानंतर सामंत यांनी आंदोलन मागे घेतले.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबई ते साईनगर शिर्डी दरम्यान अतिजलद विशेष गाड्या धावणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -