घरमुंबई'तर ही वेळ राज ठाकरे यांच्यावर आली नसती', विनोद तावडे यांची टिका

‘तर ही वेळ राज ठाकरे यांच्यावर आली नसती’, विनोद तावडे यांची टिका

Subscribe

काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना 'लुख्खा' या भाषेत हिणवले त्याच काँग्रेसला आणि निरुपम यांना मतदान करण्याची वेळ आज मनसेच्या कार्यकर्त्यांवर आली आहे, अशी खरमरीत टिका शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली आहे.

काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ‘लुख्खा’ या भाषेत हिणवले त्याच काँग्रेसला आणि निरुपम यांना मतदान करण्याची वेळ आज मनसेच्या कार्यकर्त्यांवर आली आहे. हा खरंच मनसेच्या कार्यकर्त्यांवर अत्याचार आहे, अशी खरमरीत टिका शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज, रविवारी माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांच्यावर केली. राज ठाकरे यांनी कालच्या मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याविरुध्द केलेल्या टिकेला उत्तर देताना विनोद तावडे म्हणाले की, कालच्या मेळाव्यातील भाषणासाठी राज ठाकरे यांनी जसे कष्ट घेतले ते आधी घेतले असते तर आज दुसऱ्यासाठी सभा घेण्याची वेळ आली नसती. स्वतःचे इंजिन आता बंद पडले ते सध्या दुसऱ्याला लावून चालवण्याचा प्रयत्न करत आहेत.

सव्वाशे कोटी लोकसंख्येचा देश

राहुल गांधी यांना पंतप्रधान करा. मग देश चालेल तरी नाही तर खड्ड्यात तरी जाईल, असे बोलणाऱ्या राज ठाकरे यांच्यावर टिका करताना विनोद तावडे म्हणाले की, हा सव्वाशे कोटी लोकसंख्येचा देश आहे. हा काही खेळ नाही. खड्ड्यात जायला काय मनसे पक्ष आहे, असा उपरोधिक सवालही त्यांना केला. तसेच राहुल गांधी पंतप्रधान चालेल का हे आधी शरद पवार यांना विचारुन घ्यावे, नाहीतर पुढील तुमच्या स्क्रिप्ट बंद होतील, असा टोलाही तावडे यांनी मारला.

- Advertisement -

ही भाषा निवडणूक आचार संहितेमध्ये बसत नाही

शरद पवार, भुजबळ, अजित पवार यांच्या विरुध्द राज ठाकरे आधी काय बोलले हे आठवून बघा, असे सांगताना तावडे म्हणाले की, भारतामध्ये लोकशाही नसती तसेच मानवी हक्काची जपणूक नसती तर युनायटेड नेशन्स ह्युमन राईटस कौन्सिलच्या टॉप मोस्ट बॉडीवर सुमारे १९३ देशांपैकी १८८ देशांनी भारताला पाठिंबा देऊन निवडून दिले असते का. मग जगातील सर्व देश मुर्ख आहेत आणि तुमचेचं खरं आहे का, अशी टिकाही त्यांनी यावेळी केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श घेऊन चालणाऱ्यांनी हा नको म्हणून त्याला दुसऱ्याला द्या, असे म्हणणे बरोबर नाही. तसेच राज ठाकरे यांनी कालच्या मेळाव्यात जी भाषा वापरली ती भाषा मराठी माणसाला आवडत नाही. त्यांचे असे बोलणे निवडणूक आचार संहितेमध्ये बसत नाही, असेही तावडे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -