घरपालघरMeera - Bhayander News: खासगी टँकरवाल्यांनो पाणी गुणवत्ता अहवाल सादर करा

Meera – Bhayander News: खासगी टँकरवाल्यांनो पाणी गुणवत्ता अहवाल सादर करा

Subscribe

कधी कधी शटडाऊन किंवा पाईपलाईन लाईन फुटल्यामुळे दोन - दोन दिवस येत नाही. त्यामुळे नागरिकांना खासगी टँकरवरच अवलंबून राहावे लागते.

भाईंदर :- मीरा- भाईंदर शहराराची लोकसंख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे महापालिकेकडून करण्यात येणारा पाणीपुरवठा अपुरा पडत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना नेहमीच पाणी समस्या जाणवत आहे. परिणामी रहिवाशांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने खासगी टँकर चालकांवर अवलंबून राहावे लागते. खासगी टँकर चालकांकडून करण्यात येणारा पाणीपुरवठा दूषित असण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने टँकरमालकांना पुरवठा करत असलेल्या पाण्याचा गुणवत्ता अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी महापालिकेने टँकरमालकांना नोटिसा पाठवल्या आहेत. नोटिसा पाठवल्यानंतरही एकाही टँकर मालकाने महापालिकेला अहवाल सादर केलेला नाही.  मीरा -भाईंदर शहराला एमआयडीसी व स्टेम प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा करण्यात येतो. आवश्यक असलेला पाणीपुरवठा होत नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील नागरिकांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शहरातील नागरिकांना खासगी टँकर चालकांवर अवलंबून राहावे लागते. शहरात अनेक खासगी टँकर पाणीपुरवठा करत आहेत. टँकर चालकांनी हे टँकर दहा हजार लिटर पासून ते लहान टेम्पोमध्ये हजार – दोन हजार लिटरचे बनवले आहेत. शहरातील नागरिकांना महापालिकेकडून 30 ते 35 तासाच्या अंतराने करण्यात येतो. कधी कधी शटडाऊन किंवा पाईपलाईन लाईन फुटल्यामुळे दोन – दोन दिवस येत नाही. त्यामुळे नागरिकांना खासगी टँकरवरच अवलंबून राहावे लागते. काही खासगी टँकर मालकांच्या स्वतःच्या विहिरी, बोअरवेल अथवा तलाव आहेत. तर काही टँकर चालक हे दुसर्‍या वर अवलंबून आहेत. हे टँकर चालक या विहिरीतून किंवा बोअवेल मधून पाणी भरून नागरिकांच्या मागणीनुसार पुरवठा करतात. हे खासगी टँकर मालक पाणी पुरवत असताना त्या पाण्याची गुणवत्ता कशी आहे , ते पाणी पिण्यायोग्य आहे का याची कोणतीही तपासणी करत नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. आता उन्हाळा सुरू झाल्यामुळे या टँकरची मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे टँकर मालक देखील नागरिकांकडून जास्त पैसे घेत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे शहरातील खासगी टँकरने पाणीपुरवठा करणार्‍यांचे महापालिकेने नुकतेच सर्वेक्षण केले. त्यानुसार काही खासगी टँकरमालकांची यादी बनवण्यात आली आहे. महापालिकेने सर्वेक्षण करून टँकरमालकांना नोटिसा दिल्या आहेत. त्यात मीरारोडमधील 16 , काशीमीरा 12, भाईंदर पश्चिम 9 , घोडबंदर 8, वरसावे 6, मुर्धा ते उत्तन भाग 4, गोडदेव 3, नवघर 3 अशा प्रकारे नोटिसा देण्यात आल्या आहेत. या सर्वांना महापालिकेने नोटिसा पाठवून ते पुरवत असलेल्या पाण्याच्या गुणवत्तेचा अहवाल सादर करण्यास सांगितले होते. परंतु यापैकी एकानेही अद्याप अहवाल सादर केलेला नाही. त्यामुळे या सर्वावर कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. प्रतिक्रिया मीरा -भाईंदर शहरामध्ये टँकर मालक हे खासगी बोरवेल, विहिरी, तलाव व इतर स्त्रोतातून पाणी उपसा करतात. त्या पाण्याचे नमुने कनिष्ठ वैद्यानिक अधिकारी, सार्वजनिक आरोग्य, प्रयोगशाळा कोकण भवन, नवी मुंबई येथून तपासणी करून पाणी पिण्यास योग्य असल्याचा अहवाल दर आठवड्याला पाणी पुरवठा विभागात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. अहवाल सादर न करता टँकरद्वारे पाणी पुरवठा केल्यास टँकर मालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. – दिपक खांबीत, शहर अभियंता, मीरा- भाईंदर महापालिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -