घरपालघरआदिवासी शेतकरी करू लागलाय भाजीपाला लागवड

आदिवासी शेतकरी करू लागलाय भाजीपाला लागवड

Subscribe

जव्हार तालुक्यात भात कापणी, बांधणी अंतिम टप्प्यात असून आता तालुक्यातील शेतकरी भाजीपाला लागवड ते वालाच्या शेतीच्या लागवडीला मोठ्या प्रमाणात लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. लागवड करणार्‍या भागात नांगरणी व तंत्रज्ञानाचाही वापर होत आहे.

जव्हार: आदिवासी आणि ग्रामीण भागात आधुनिक तंत्रज्ञान वापरून अत्याधुनिक साधने आणि सुधारित वाणाचे बी बियाणे यांचा वापर करून या भागातील शेतकरी भाजीपाला लागवडीकडे वळायला लागल्याने कमी वेळ कमी कष्टात जास्त नफा देणारे पिके असल्याने भाजीपाला लागवडीतून शेतकर्‍यांना आर्थिक पाठबळ मिळत आहे. जव्हार तालुक्यात भात कापणी, बांधणी अंतिम टप्प्यात असून आता तालुक्यातील शेतकरी भाजीपाला लागवड ते वालाच्या शेतीच्या लागवडीला मोठ्या प्रमाणात लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. लागवड करणार्‍या भागात नांगरणी व तंत्रज्ञानाचाही वापर होत आहे.

तालुक्यातील वनवासी, पिंपळशेत, खरोंडा, बाळ कापरा, हाडे, साकुर, आदी भागात भाजीपाला लागवड होते. त्यात वालाच्या शेतीत वाल, चवळी, कारली, मिरची, तूर, हरभरा अशा पिकांची तसेच वांगी, टोमॅटो, अशा भाजीपाल्याची लागवड शेतकरी करत आहेत.या लागवडी करताना शेतकरीवर्ग तालुका कृषी अधिकारी व तालुक्यातील सामजिक संस्थांचा कृषी तज्ञांचा सल्ला घेऊन लागवड करत आहेत, यासाठी शासनाच्या योजनाचा लाभ घेत आहेत , तालुक्यातील पाणी व्यवस्था असणार्‍या काही शेतकर्‍यांशी संवाद साधला असता ते म्हणाले की शेतामध्ये आता पाण्याचा चांगला ओलावा असून सध्या पेरणी केल्याने भाजीपाल्याची रोपे चांगली वाढून योग्य वेळी भाजीपाला तयार होऊन मालाला मागणी मिळून भाव चांगल्या प्रकारे मिळेल व फायदा होईल. आम्ही आमच्या भागात सध्या कारल्याचे पिक जास्त घेत आहोत असेही शेतकरी बोलत आहेत.

- Advertisement -

**भाजीपाला पीक व्यवस्थापन**

योग्य नियोजन आणि काळजी घेतल्यास भाजीपाल्यातून कमी वेळात जास्त नफा मिळतो. तालुक्यातील शेतक-यांनी व्यावसायिक दृष्टिकोनातून बाजारातील उपलब्धता आणि मागणी यानुसार नियोजन करून भाजीपाला पिकवल्यास हा व्यवसाय आर्थिकदृष्ट्या अधिक फायदेशीर ठरू शकतो.असे तालुका कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -