मुंबई शहराला 'मुंबई' हे नाव 'मुंबादेवी' वरुनच मिळालं आहे. मुंबा देवी मुंबईची आद्य ग्रामदेवता मानली जाते. मुंबईतील मूळ रहिवासी असलेल्या कोळी बांधवांनी १७३७ साली, आताच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाटावर मुंबादेवीचे देऊळ उभारले होते. जाणून घेऊया, मुंबा देवीविषयीची रंजक माहिती...