घरफोटोगॅलरीPhoto : राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप, धारावीमध्ये जंगी...

Photo : राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप, धारावीमध्ये जंगी स्वागत

Subscribe

मुंबई : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप आज, शनिवारी दादर येथील चैत्यभूमीवर झाला. ठाण्यातून या यात्रेने प्रवेश केल्यानंतर धारावी मार्गे ती दादर येथे पोहोचली. धारावीला राहुल गांधी यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. येथे आयोजित सभेमध्ये राहुल गांधी यांनी प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

- Advertisement -

राहुल गांधी यांनी 14 जानेवारी रोजी मणिपूरहून भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात केली होती.

- Advertisement -

तब्बल 63 दिवसांच्या 6600 किमी यात्रेतून राहुल गांधी यांनी 15 राज्यांना भेटी दिल्या. दादरच्या चैत्यभूमीवर या यात्रेचा समारोप झाला.

मुंबईतील धारावीमध्ये आल्यानतंर राहुल गांधी यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्या भगिनी प्रियंका गांधी या देखील उपस्थित होत्या.

धारावी म्हणजे कौशल्याचे केंद्र असून हेच खरे ‘मेक इन इंडिया’ आहे. धारावीतील कौशल्याला आर्थिक पाठबळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -