इंडोनेशियात सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये भारताने आतापर्यंत उत्तम कामगिरी केली असून नुकतेच भारताने १३ वं सुवर्णपदक आपल्या नावे केलं आहे. भारताच्या महिला रिले संघाने ४x४०० मीटर शर्यतीत विजय मिळवला आहे. भारताच्या हिमा दास, सरिताबेन गायकवाड,विसमया आणि एम आर पुवम्मा या चौघींनी अवघ्या ३.२८.७२ इतक्या वेळेत शर्यत जिंकत विजय मिळवला आहे.
#AsianGames2018
Women’s Team does it for a record fifth time! 5⃣❎?
In #Athletics 4x400m Women’s Finals, #TeamIndia comprising of #HimaDas, #MRPoovamma, #SaritabenGayakwad and #Vismaya finish 1st in 3:28.72 to stay unbeaten in 5 #AsianGames! #WellDone girls???#IAmTeamIndia pic.twitter.com/l06D9tHNsp— Team India (@ioaindia) August 30, 2018
भारतीय महिला रिले संघाचा विक्रमी ५ वा विजय
भारतीय महिला रिले संघाने सलग पाचव्यांदा ४x४०० मीटर शर्यतीत विजय मिळवत भारताला स्पर्धेतील १३ वं सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. याआधी भारताच्या महिला संघाने ४ वेळेस ४x४०० मीटर शर्यतीत विजय मिळवला होता. आपल्या या ५ व्या विजयाबरोबरच भारतीय महिना संघाने एका विक्रमाची देखील नोंद केली आहे.