घरक्रीडा'त्या' विधानाबद्दल हार्दिक पांड्याचा माफिनामा

‘त्या’ विधानाबद्दल हार्दिक पांड्याचा माफिनामा

Subscribe

कॉफी वुईथ करणमध्ये महिलांवर केलेल्या वादग्रस्त विधानावर आता भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्यानं माफी मागितली आहे.

कॉफी वुईथ करणमध्ये महिलांवर केलेल्या वादग्रस्त विधानावर आता भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्यानं माफी मागितली आहे. कॉफी वुईथ करणमध्ये हार्दिक पांड्यानं अनेक वादग्रस्त विधानं केली. त्यानंतर नेटीजन्सनी हार्दिक पांड्यावर टीका केली. सोशल मीडियावर झालेल्या टीकेनंतर हार्दिक पांड्यानं कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास माफी मागतो असं म्हटलं आहे. या कार्यक्रमामध्ये हार्दिक पांड्यासोबत के. एल. राहुल देखील हजर होता.

पांड्याचं वादग्रस्त विधान

कॉफी वुईथ करणमध्ये हार्दिक पांड्यानं मी अनेक महिलांसोबत रिलेशिनशिपमध्ये होतो. ही बाब माझ्या पालकांना माहित होती. दरम्यान, ज्यावेळी मी माझे कौमार्य गमावले त्यावेळी मी माझ्या पालकांना आज मी करून आलोय असं सांगितलं होतं. तसंच एकच मेसेज अनेक मुलींना पाठवण्यामध्ये मला काहीच वाटत नाही. शिवाय, मी त्यांच्या उपलब्ध असण्याबाबत खुलेपणानं चर्चा करतो. हार्दिक पांड्याच्या या विधानानं सोशल मीडियावर त्याला धारेवर धरलं गेलं. त्यानंतर हार्दिक पांड्यांनं देखील कुणाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता असं म्हणत माफीनामा सादर केला आहे.

- Advertisement -

BCCIनं घेतली दखल

दरम्यान, या साऱ्या प्रकरणाची दखल आता बीसीसीआयनं देखील घेतली आहे. बीसीसीआय कार्यक्रम पाहून हार्दिक पांड्यावर कारवाई करणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्यानं दिली आहे. यापूर्वी देखील हार्दिक पांड्यानं केलेल्या विधानावरून वाद झालेले आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -