घरक्रीडाIND vs AUS : भारताने जिंकला तिसरा टी-२० सामना, मालिकेत बरोबरी

IND vs AUS : भारताने जिंकला तिसरा टी-२० सामना, मालिकेत बरोबरी

Subscribe

भारताने तिसरा टी-२० सामना ६ विकेट राखून जिंकला.

कृणाल पांड्या आणि विराट कोहलीच्या चांगल्या प्रदर्शनामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा टी-२० सामना भारताने ६ विकेट राखून जिंकत ३ सामन्यांच्या या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. या मालिकेतील पहिला सामना भारताने गमावल्यानंतर दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला होता.

कृणालच्या ४ विकेट 

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १६४ अशी धावसंख्या केली होती. ऑस्ट्रेलियासाठी डार्सी शॉर्ट (३३), अॅरॉन फिंच (२८), अॅलेक्स कॅरी (२७) आणि मार्कस स्टोइनिस (२५) यांनी चांगली फलंदाजी केली. तर भारताकडून कृणाल पांड्याने अप्रतिम गोलंदाजी करत आपल्या ४ षटकांत ३६ धावा देत ४ विकेट घेतल्या.

 

कोहलीचे दमदार प्रदर्शन 

ऑस्ट्रेलियाने दिलेले १६५ धावांचे लक्ष्य भारताने १९.४ षटकांत गाठले. भारताकडून कर्णधार विराट कोहलीने ६१ धावांची मॅचविनिंग खेळी केली. तर शिखर धवन (४१), रोहित शर्मा (२३) आणि दिनेश कार्तिक (२२*) यांनीही चांगली फलंदाजी केली.
- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -