कृणाल पांड्या आणि विराट कोहलीच्या चांगल्या प्रदर्शनामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा टी-२० सामना भारताने ६ विकेट राखून जिंकत ३ सामन्यांच्या या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. या मालिकेतील पहिला सामना भारताने गमावल्यानंतर दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला होता.
कृणालच्या ४ विकेट
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १६४ अशी धावसंख्या केली होती. ऑस्ट्रेलियासाठी डार्सी शॉर्ट (३३), अॅरॉन फिंच (२८), अॅलेक्स कॅरी (२७) आणि मार्कस स्टोइनिस (२५) यांनी चांगली फलंदाजी केली. तर भारताकडून कृणाल पांड्याने अप्रतिम गोलंदाजी करत आपल्या ४ षटकांत ३६ धावा देत ४ विकेट घेतल्या.
4-0-36-4 @krunalpandya24 now holds the record for the best figures by a spinner in T20Is in Australia ?? pic.twitter.com/AFtfusuljo
— BCCI (@BCCI) November 25, 2018
कोहलीचे दमदार प्रदर्शन
ऑस्ट्रेलियाने दिलेले १६५ धावांचे लक्ष्य भारताने १९.४ षटकांत गाठले. भारताकडून कर्णधार विराट कोहलीने ६१ धावांची मॅचविनिंग खेळी केली. तर शिखर धवन (४१), रोहित शर्मा (२३) आणि दिनेश कार्तिक (२२*) यांनीही चांगली फलंदाजी केली.
INDIA WIN! ????
Level the three match series 1-1 #AUSvIND pic.twitter.com/m5DeOC6KO2
— BCCI (@BCCI) November 25, 2018
- Advertisement -