घरक्रीडाविराटचा ताबा जरा सुटलाच - विश्वनाथन आनंद

विराटचा ताबा जरा सुटलाच – विश्वनाथन आनंद

Subscribe

चाहत्याला देश सोडून जा म्हणताना विराटचा ताबा जरा सुटलाच असे मत भारताचा महान बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने व्यक्त केले आहे. 

भारताचा कर्णधार विराट कोहलीला भारतातील एका चाहत्याने मला भारतापेक्षा ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या खेळाडूंची फलंदाजी आवडते असे म्हटले होते. तर विराटने त्या चाहत्याला जर भारतीय खेळाडू आवडत नसतील तर देश सोडून जा असे सुनावले होते. यावेळी विराटचा ताबा जरा सुटलाच असे मत भारताचा महान बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने व्यक्त केले आहे.

आता हा विषय थांबवायला हवा

विराटच्या वक्तव्याबाबत आनंद म्हणाला, “त्याचा ताबा जरा सुटलाच. तो थोडा भावुक झाला आणि डोक्यात पहिल्यांदा जे आले ते बोलून गेला. विराटने तसे बोलायला नको होते. तुम्ही खेळांमध्ये विविध वृत्तीची माणसे बघता. विराट हा जरा आक्रमक वृत्तीचा आहे. त्यामुळे तो पटकन काहीतरी बोलून बसला. पण शेवटी तो माणूस आहे. माणसे भावुक होतात आणि नको ते बोलून जातात. असे माझ्याकडूनही झाले आहे. त्याच्या वक्तव्यावरून त्याच्यावर बरीच टीका झाली आहे. मला वाटते आता हा विषय थांबवायला हवा.”

चाहत्याला म्हटले तर देश सोडून जा

विराटच्या ३० व्या वाढदिवसानिमित्त त्याचे अधिकृत अॅप लाँन्च झाले. त्यानिमित्ताने एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. त्यामध्ये एका क्रिकेट चाहत्याने विराटवर टीका केली. ज्यात तो चाहता म्हणाला, “विराटच्या फलंदाजीमध्ये काही खास नाही. मला भारतीय फलंदाजांपेक्षा इंग्लिश आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंची फलंदाजी जास्त आवडते.” यावर विराट त्याला प्रतिउत्तर देताना म्हणाला, “मला नाही वाटत की तू भारतात राहायला पाहिजेस. तुझे जर दुसऱ्या देशावर प्रेम असेल तर तू आमच्या देशात का राहतोस? तुला माझी फलंदाजी आवडत नाही याचा मला फरक नाही पडत.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -