भारताचा कर्णधार विराट कोहलीला जागतिक टी-२० क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत एका स्थानाची बढती मिळाली असून तो आठव्या स्थानावर पोहोचला आहे. बुधवारी जाहीर झालेल्या ताज्या क्रमवारीनुसार, भारताचा सलामीवीर लोकेश राहुलने अव्वल तीन फलंदाजांमध्ये एंट्री केली. राहुल ८१६ गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचला असून त्याच्यात आणि दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या बाबर आझममध्ये ५५ गुणांसह फरक आहे. इंग्लंडचा डावखुरा फलंदाज डाविड मलान ९१५ गुणांसह अव्वल स्थानी कायम आहे.
Gains for 🇮🇳 in the latest @MRFWorldwide ICC Men’s T20I Batting Rankings, with Virat Kohli and KL Rahul both moving up a spot within the top 🔟
Rankings ▶️ https://t.co/H7CnAiw0YT pic.twitter.com/ktHXBMeIsC
— ICC (@ICC) December 9, 2020
भारतीय संघाने नुकत्याच झालेल्या टी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियावर २-१ असा विजय मिळवला. भारताच्या या विजयात कर्णधार विराट कोहलीने महत्वाची भूमिका बजावली. त्याने दुसऱ्या सामन्यात ४०, तर तिसऱ्या सामन्यात ८५ धावांची खेळी केली होती. या चांगल्या कामगिरीमुळे त्याला एका स्थानाची बढती मिळाली असून फलंदाजांच्या यादीत तो आठव्या स्थानावर पोहोचला आहे. विराटच्या खात्यात ६९७ गुण आहेत. तसेच पहिल्या टी-२० सामन्यात ५१ धावांची खेळी करणाऱ्या लोकेश राहुलला एका स्थानाची बढती मिळाली. त्याने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचला मागे टाकत तिसरे स्थान पटकावले. फिंचचे ८०८ गुण असून राहुलचे आता ८१६ गुण झाले आहेत.