घरठाणेबाबासाहेबांचे स्मारक प्रेरणेचे ऊर्जा स्थान-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बाबासाहेबांचे स्मारक प्रेरणेचे ऊर्जा स्थान-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Subscribe

कल्याण । कल्याण मधील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक सर्वाना एक प्रेरणा, एक ऊर्जा देत राहिल असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी रात्री केले. महाराष्ट्र शासन, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानकेंद्र स्मारक समिती आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून महापालिकेच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रभागक्षेत्र कार्यालयाच्या परिसरात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळयाचे दुरदृश्य प्रणालीद्वारे अनावरण करतेवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असे प्रतिपादन केले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री (सामाजिक न्याय व सक्षमीकरण) रामदास आठवले, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ , शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानकेंद्र स्मारक समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब रोकडे, कार्याध्यक्ष महेश गायकवाड राष्ट्रवादीचे प्रमोद हिंदुराव व इतर अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी भारताच्या जडणघडणीत दिलेले योगदान अभुतपूर्व आहे. त्यांनी सामाजिक क्रांतीचा, परिवर्तनाचा वारसा आपल्याला दिला आहे. तो वारसा घेवूनच आपले सरकार काम करीत आहे. समता, स्वातंत्र्य, सामाजिक आर्थिक हक्क, स्त्री पुरूष समानता, समाजातील सर्व व्यक्तींना शिक्षणाची विकासाची संधी ही सामाजिक न्यायाची तत्वे आहेत आणि हाच आपल्या राज्यकारभाराचा पाया आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमुळे, त्यांनी लोककल्याणकारी काम केले आणि त्यांनी खर्‍या अर्थाने लोकशाही आणली असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. सरकारच्या माध्यमातून स्मारकाला निधी कमी पडू दिला जाणार नाही असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कल्याण मधील हे स्मारक हे आपल्या सर्वांच्या मेहनतीतुन, सगळयांच्या सहकार्यातून उभे राहिले आहे, हे केवळ पुतळयाचे अनावरण नव्हे तर बाबासाहेबांचे चरित्र सर्वांसमोर ठेवीत आहोत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याचे स्वप्न आज साकार झाले त्यात खारीचा वाटा मी उचलला याचा मला अभिमान आहे, असे उद्गार खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी यावेळी बोलताना काढले.

- Advertisement -

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामुळे कल्याण मधील नव्हेच, तर आजुबाजूच्या परिसरातील नागरीकांसाठी या स्मारकाच्या स्वरुपात एक जिव्हाळयाचे श्रध्दास्थान उपलब्ध होणार आहे. स्मारकामध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेली तैलचित्रे, विविध प्रकारची म्युरल्स, वाचनालय इ.सुविधांमुळे नागरीकांना आपल्या कुटूंबियासमवेत या स्मारकास भेट देवून चालत्या बोलत्या ज्ञान विदयापीठात येवून ज्ञानार्जन करता येईल, असे उद्गार महापालिका आयुक्त डॉ.इंदू राणी जाखड़ यांनी आपल्या भाषणात काढले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -