आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल, रायगडचा कायापालट केला असून विकासाचा ही गंगा यापुढे कायम ठेवायची असल्यास ठाकूर यांनाचा विक्रमी मतांनी निवडून द्या, असे आवाहन आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी कळंबोली येथील सभेत बोलताना केले.
स्वच्छ चारित्र्याची माणसे राजकारणात टिकली तर लोकशाही टिकेल आणि आपला देश प्रगतीपथावर जाईल. विशेष म्हणजे प्रशांत ठाकूर हे सर्वसामान्य लोकांना सोबत घेऊन जाणारे आहेत, याकडे भोसले यांनी लक्ष वेधले. पनवेलमधील अनेक घरे धोकादायक अवस्थेत असून त्यांच्या पुनर्बांधणीसाठी परवानगी घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यासाठी ठाकूर यांनी मेहनत घेतली आहे. हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी ठाकूर यांना निवडून द्यायला हवे, असे या सभेत माथाडींचे नेते ऩरेंद्र पाटील म्हणाले.
यावेळी महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी शेकापवर सडकून टीका केली. शेकापला सोन्याची अंडी देणारी कोंबडी असणार्या ग्रामपंचायती सोडायच्या नव्हत्या म्हणून त्यांनी महानगरपालिकेला तीव्र विरोध केला. मला महानगरपालिकेच्या माध्यमातून पनवेलचा विकास करायचा आहे आणि तो मी करणार आहे. काँग्रेसने अनेक वर्षे सत्ता भोगली, पण गरीबी हटली नाही.
आता पंतप्रधान नरेंद मोदीजींच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शहर गावांचा विकास होत आहे. महायुतीच्या सरकारकडून २०१५ पर्यंतची बांधकामे नियमित करण्यात येणार आहेत. त्यासाठी मी सतत प्रयत्नशील आहे, अशी स्पष्ट भूमिका प्रशांत ठाकूर यांनी मांडली.