मुंबईत वांद्रे आणि गोरेगावमध्ये सभा घेतल्यानंतर राज ठाकरेंच्या ११ ऑक्टोबरला मुंबईतच तीन सभा होणार आहेत. त्यात भांडुपमध्ये राज ठाकरेंची पहिली सभा झाली. त्या सभेत त्यांनी मतदानाचं राजकारण आणि आपली विरोधी पक्षाची भूमिका पुन्हा एकदा मतदारांना सांगितली. ‘गेल्या ५ वर्षांपासून जाहीरनामे जाहीर करायचे आणि त्यानंतर त्यावर काहीही करायचं नाही. आणि मतदारांना देखील त्यातलं काहीही आठवत नाही. इथे निवडणुकांचं कुणाला काही पडलेलंच नाही’, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच, यावेळी त्यांनी शिवसेना आणि भाजपचे गेल्या निवडणुकीतले जाहीरनामे देखील वाचून दाखवले.