देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. देशात सर्वाधिक कोरोनाबाधित राज्य महाराष्ट्र असले तरी येथील रिकव्हरी रेट गेल्या काही दिवसांपासून वाढताना दिसत आहे. पण वाढता मृत्यूदर राज्यातील अद्याप चिंताजनक आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १२ हजार २५८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३७० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १४ लाख ६५ हजार ९११ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ३८ हजार ७१७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे. (सविस्तर वाचा)
मुंबईत आज कोरोनाचे १ हजार ६२५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आल्याने कोरोनाबाधितांची संख्या २ लाख १७ हजार ०९० वर पोहचली आहे. तर ४७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ९ हजार १९९ वर पोहचला आहे. तर चिंतेची बाब म्हणजे सध्या मुंबईत २३ हजार ९७६ Active रुग्ण असून त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू आहेत.
Mumbai reports 1625 new #COVID19 cases, 47 deaths and 1966 recoveries/discharges. Total cases here rise to 2,17,090, including 9,199 deaths and 1,81,485 recoveries/discharges. Active cases stand at 23,976: Municipal Corporation Greater Mumbai pic.twitter.com/llfZSUKLZf
— ANI (@ANI) October 6, 2020
धारावीत आज २२ कोरोना रूग्णांची नोंद
धारावीत आज २२ कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली असून धारावीतील बाधितांचा आकडा हा ३ हजार २८० वर पोहोचला आहे. यापैकी १९२ रूग्ण सध्या अॅक्टिव्ह असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. आणि दिलासादायक २ हजार ७९५ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.
22 new #COVID19 cases reported in Dharavi area of Mumbai today, taking the total number of cases to 3,280 including 192 active cases and 2,795 discharges: Brihanmumbai Municipal Corporation (BMC). #Maharashtra pic.twitter.com/39zDjjj3Y9
— ANI (@ANI) October 6, 2020
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. दिगंबर शिर्के
कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ सांख्यिकी विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. दिगंबर तुकाराम शिर्के यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी डॉ. शिर्के यांच्या नियुक्तीची घोषणा केली. डॉ. शिर्के यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे. (सविस्तर वाचा)
मुंबई मालवणी परिसरातील 45 वर्षीय महिलेकडून 25 ग्रॅम ड्रग्स ताब्यात घेतले. मुंबई पोलिसांनी आज या महिलेला अटक केली.
Maharashtra: Mumbai Police arrested a 45-year-old woman in possession of 25 grams of MD drugs in Malvani area, today.
— ANI (@ANI) October 6, 2020
देशातील २५ जिल्ह्यातील ४८ % मृत्यू फक्त कोरोनामुळे झाले आहेत. या २५ जिल्ह्यापैकी १५ जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य मंत्रालय या राज्यांशी चर्चा करीत आहे.
48% of COVID-related deaths reported from 25 districts in the country. Out of 25 districts, 15 districts are from Maharashtra. Health Ministry is in talks with these states to control the COVID deaths. The target is to bring fatality below 1%: Rajesh Bhushan, Health Secretary https://t.co/ARTmqBJDoS
— ANI (@ANI) October 6, 2020
आरे कॉलनी गोरेगाव चिमुरडीवर अत्याचार
यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चिञाताई वाघ यांच्या सोबत या पिडीत मुलीच्या वडीलांची प्रत्यक्ष भेंट घेतली.
तसेच अशा महिला व मुलींच्या अब्रुचे लचके तोडले जात आहेत.याप्रकरणा संदर्भात पोलिस उपायुक्त स्वामी यांची भेंट घेऊन झाल्या प्रकरणा संदर्भात कठोरात कठोर कारवाईची मागणी केली. (सविस्तर वाचा)
पायल घोषविरोधात रिचा चढ्ढा कोर्टात, मानहानीचा दावा
दिग्दर्शक अनुराग कश्यपवर (लैंगिक गैरवर्तनाचे आरोप करणाऱ्या अभिनेत्री पायल घोषच्या अडचणी वाढल्या आहेत. अभिनेत्री रिचा चढ्ढाने (पायल घोषविरोधात मुंबई हायकोर्टात १.१ कोटींचा मानहानीचा दावा ठोकला आहे. रिचाने दाखल केलेल्या मानहानी केसवर मुंबई हायकोर्ट बुधवारी निर्णय देणार आहे.
मराठा आरक्षण स्थगितीच्या पार्श्वभूमीवर एमपीएससी परीक्षा पुढे ढकला, आमदार विनायक मेटे यांच्या उपस्थितीत मराठा विद्यार्थी परिषदेची मागणी
बॉलीवूड अभिनेता अजय देवगण यांचे भाऊ अनिल देवगण यांचा अकाली मृत्यू
बॉलीवूड अभिनेता अजय देवगण यांचे भाऊ अनिल देवगण यांचा अकाली मृत्यू झाला असून याबाबत स्वतः अजयने ट्विट करत माहिती दिली आहे. अनिल देवगण यांच्या मृत्यूचे कारण त्यांनी स्पष्ट केले नसले तरी त्यांच्या जाण्याने कुटुंबात पोकळी निर्माण झाली असल्याचे नमूद केले आहे. (सविस्तर वाचा)
I lost my brother Anil Devgan last night. His untimely demise has left our family heartbroken. ADFF & I will miss his presence dearly. Pray for his soul. Due to the pandemic, we will not have a personal prayer meet🙏 pic.twitter.com/9tti0GX25S
— Ajay Devgn (@ajaydevgn) October 6, 2020
हरयाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. याबाबत त्यांनी स्वतः सांगितले आहे.
Haryana Deputy CM Dushyant Chautala says, he has tested positive for #COVID19
(file pic) pic.twitter.com/eNXmfRQORT— ANI (@ANI) October 6, 2020
पंजाबचे आरोग्यमंत्री बलबीर सिद्धू यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
Punjab Health Minister Balbir Sidhu (file pic) tests positive for #COVID19: Health Minister's Office pic.twitter.com/ZY756Q4GNE
— ANI (@ANI) October 6, 2020
राज्यात गेल्या २४ तासांत १०४ नवे कोरोनाबाधित पोलीस आढळले असून २ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा २४ हजार २५४वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत २५३ जणांचा मृत्यू झाला असून २१ हजार ४२३ पोलीस कोरोनामुक्त झाले आहे. तसेच सध्या २ हजार ५७८ पोलिसांवर उपचार सुरू आहे, अशी माहिती महाराष्ट्र पोलीस दलाने दिली आहे.
104 police personnel tested positive for #COVID19 in the last 24 hours & 2 died, taking total positive cases to 24,254 in the force, including 21,423 recoveries, 2,578 active cases, and 253 deaths: Maharashtra Police pic.twitter.com/gp6WUnrXlB
— ANI (@ANI) October 6, 2020
रिया आणि शौविकसह इतर आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झाली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने आणखीन १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. २० ऑक्टोबरपर्यंत रिया, शौविक, सॅम्युअल मिरांडा, दिपेश सावंत, बासित परिहार आणि झैद विलात्राच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे.
Special NDPS Court extends judicial custody of Rhea Chakraborty, Showik Chakraborty and others till 20th October. #SushantSinghRajputDeathCase
— ANI (@ANI) October 6, 2020
चित्रपटप्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. १५ ऑक्टोबरपासून ५० टक्के क्षमतेने चित्रपटगृह सुरू होणार आहे. यादरम्यान प्रेक्षकांमध्ये एका सीटचे अंतर ठेवले जाणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
It is compulsory to show a minute-long film/announcement before a show as well as before & after interval, to spread awareness among people about #COVID19: Union Information & Broadcasting Minister Prakash Javadekar pic.twitter.com/Kqg7tDXRmi
— ANI (@ANI) October 6, 2020
देशात गेल्या २४ तासांत ६१ हजार २६७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ८८४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ६६ लाख ८५ हजार ८३वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ३ हजार ५६९ जणांचा मृत्यू झाला असून ५६ लाख ६२ हजार ४९२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ९ लाख १९ हजार २३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
India reports a spike of 61,267 new #COVID19 cases & 884 deaths in the last 24 hours.
Total case tally stands at 66,85,083 including 9,19,023 active cases, 56,62,491 cured/discharged/migrated cases & 1,03,569 deaths: Union Health Ministry pic.twitter.com/coF70IhRHt
— ANI (@ANI) October 6, 2020
देशात सोमवारी दिवसभरात १० लाख ८९ हजार ४०३ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहे. त्यामुळे देशात आतापर्यंत झालेल्या नुमन्यांच्या चाचणीचा आकडा ८ कोटी १० लाख ७१ हजार ७९७वर पोहोचला आहे, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.
10,89,403 samples tested for #COVID19 on 5th October. Total of 8,10,71,797 samples tested in the country up to 5th October: Indian Council of Medical Research (ICMR) pic.twitter.com/OOs6un6qOq
— ANI (@ANI) October 6, 2020
राहुल गांधींच्या ट्रॅक्टर रॅलीचा आज शेवटचा दिवस आहे. आज ट्रॅक्टर रॅली पंजाबहून हरयाणात पोहोचणार आहे. पण यावेळेस जमावासह आल्यास प्रवेश नाही, असा इशार हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी दिल आहे. त्यामुळे हरयाणाच्या सीमेवर भाजप-काँग्रेस कार्यकर्ते भिडण्याची शक्यता आहे.
कृषी कायद्यांबाबत मुख्यमंत्र्यांची आज शेतकरी संघटनांशी चर्चा होणार आहे. आज दुपारी ४ वाजता सह्याद्री अतिथीगृहावर यासंदर्भात बैठक होणार आहे. मंत्रिमंडळ उपसमिती, शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची ही बैठक असणार आहे. मुख्यमंत्री विधेयकातील त्रुटी, जाचक अटीसंदर्भात मतं जाणून घेणार आहेत.
जगातील सातत्याने कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसत आहे. त्याचप्रमाणे कोरोना रुग्ण बरे होण्याचा देखील आकडा वाढताना दिसत आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत ३ कोटी ५६ लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी १ लाख ४५ हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच २ कोटी ६८ लाखांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्यात सोमवारी १० हजार २४४ नवीन रुग्णांची नोंद झाली असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४ लाख ५३ हजार ६५३ झाली आहे. राज्यात २ लाख ५२ हजार २७७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात काल २६३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या ३८ हजार ३४७वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे. सविस्तर वाचा