गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या शाहीन बागेसह देशभरातल्या विविध ठिकाणी नागरिकत्व (सुधारणा) विधेयक आणि एनआरसीविरोधात आंदोलन सुरू आहे. या कायद्याला मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. तसेच, एनआरसी नक्की राबवलं जाणार आहे की नाही? याविषयी देखील देशवासीयांमध्ये संभ्रमाची परिस्थिती असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशच्या चंडौली भागामध्ये सभेत बोलताना सीएएविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘गेल्या कित्येक वर्षांपासून भारत ३७० हटवणे आणि नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर होण्यासारख्या निकालांची वाट पहात होता. अखेर ते निर्णय घेण्यात आले. हे निर्णय देशाच्या हितासाठी आवश्यक होतं. म्हणून ते घेण्यात आले. याबाबत मोठ्या प्रमाणावर सरकारवर दबाव टाकण्यात येत आहे. मात्र, तरीदेखील आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. आणि भविष्यात देखील आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम राहणार आहोत’, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी बोलताना म्हणाले.
PM Narendra Modi in Chandauli: For years, India had been waiting for decisions like repealing Article 370 and introduction of CAA. These decisions were necessary in interest of the country. Despite all the pressure, we stood our ground over these decisions and will remain so. pic.twitter.com/bIFoa4rrvV
— ANI UP (@ANINewsUP) February 16, 2020