मीरा-भाईंदरपाठोपाठ ठाणे जिल्ह्यात देखील आज मध्यरात्रीपासून भाजीपाला, बाजारपेठा बंद राहतील. ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिंवंडी या बाजारपेठा देखील बंद राहतील
मीरा-भाईंदरमध्ये ११ एप्रिल सकाळी ६ वाजेपासून १४ एप्रिल रात्री १२ वाजेपर्यंत भाजीपाला विक्री बंद.
विक्रोळीमध्ये शुक्रवारी कोरोनाचे दोन नवे रुग्ण सापडले. विक्रोळीतील कन्नमवार नगरमध्ये 40 वर्षीय महिला तर टागोर नगरमध्ये 63 वर्षीय पुरुष कोरोनाबाधित सापडल्याने विक्रोळीमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मुंबईत आज दिवसभरात कोरोनामुळे १० जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या ९९३वर. आज दिवसभरात मुंबईत सापडले २१८ रुग्ण. यापैकी ६० टक्के रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणं जाणवत नव्हती. त्यामुळे या रुग्णांना सायलेंट कॅरिअर म्हटलं जात आहे.
भारतातील लॉकडाउन सर्वात प्रभावी – ऑक्सफोर्ड विद्यापीठाकडून कौतुक
नगर जिल्ह्यात कोरोनाने पहिला बळी घेतला आहे. श्रीरामपूर येथील २८ वर्षीय मतिमंद तरुणाचा पुण्यात मृत्यू झाला. मात्र हा मृत्यु कोरोनामुळे झाला की अन्य आजाराने याबाबत अनिश्चितता आहे. या तरुणाला इतरही आजारांनी ग्रासले होते. जिल्ह्यात आत्तापर्यत २६ कोरोना रुग्ण होते, त्यापैकी तीन ठणठणीत बरे झाले तर एकाचा मृत्यू झाला. तिसऱ्या कोरोनामुक्त रुग्णालादेखील शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. जिल्हा प्रशासनाने त्याच्या मृत्यूस दुजोरा दिला.
एप्रिल महिन्यात देशभरात सर्व प्रकारचे सण, उत्सव आणि सभांवर बंदी घातल्याचे आदेश केंद्रीय गृहविभागाने दिले आहेत.
भारत अजूनही कोरोना स्प्रेडच्या तिसऱ्या स्टेजमध्ये गेलेला नाही. भारतात कम्युनिटी स्प्रेडला सुरूवात झालेली नाही अशी माहिती केंद्रीय आरोग्य सचिवांनी दिली आहे.
धारावीतील प्रत्येक नागरिकाची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. या मोहिमेअंतर्गत महापालिका तब्बल साडेसात लाख लोकांच्या चाचण्या करणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.
डॉक्टरच्या चुकीमुळे कोरोनाग्रस्ताचा मृत्यू
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने महापालिकेला तीन कोटींची मदत केली आहे.
#Update: After contributing ₹ 25 cr to #PMCares, #AkshayKumar contributes ₹ 3 cr to #BMC to assist in the making of PPEs, masks and rapid testing kits… #COVID19Pandemic #CoronaVirus #Covid_19 #COVID19
— taran adarsh (@taran_adarsh) April 10, 2020
खारघरमध्ये आढळलेल्या कोरोनाबाधित रिक्षा चालकाचा मृत्यू झाला आहे. हा पनवेलमधील कोरोनाचा पहिला बळी आहे. त्यामुळे आता नवी मुंबईत देखील भीतीचे वातावरण पसरले आहे. (सविस्तर वृत्त)
दादरमध्ये आज पुन्हा कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. दादरच्या सुश्रूषा रुग्णालयातील दोन परिचारिकांना कोरोनाची लागण झाली आहे. (सविस्तर वृत्त)
धारावीमध्ये पाच नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. (सविस्तर वृत्त)
5 more #COVID19 cases reported in Dharavi, Mumbai taking the total number of coronavirus positive cases in the area to 22: Brihanmumbai Municipal Corporation (BMC) #Maharashtra pic.twitter.com/MTgmMcxtRk
— ANI (@ANI) April 10, 2020
सांगलीतील २६ रुग्णांपैकी २२ रुग्ण कोरोनामुक्त
तुम्हा सर्वांना सांगण्यात आनंद होतोय की सांगलीतील २६ रुग्णांपैकी २२ रुग्ण आता कोरोनामुक्त झाले आहेत. आपण कोरोनावर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी होत आहे. जिल्ह्यात २६ रुग्ण आढळल्याने पालकमंत्री आणि इस्लामपूर मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून दुहेरी दडपणात होतो. मात्र, आता दिलासा मिळाला आहे’, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.
तुम्हा सर्वांना सांगण्यात आनंद होतोय की सांगलीतील २६ रुग्णांपैकी पैकी २२ रुग्ण आता कोरोनामुक्त झालेत. आपण कोरोनावर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी होतोय. जिल्ह्यात २६ रुग्ण आढळल्याने पालकमंत्री व इस्लामपूर मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून दुहेरी दडपणात होतो, मात्र आता दिलासा मिळाला आहे.
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) April 10, 2020
वाधवानप्रकरणी अमिताभ गुप्ता सक्तीच्या रजेवर
येस बँक आणि डीएचएफएल घोटाळ्यातील वाधवान बंधू यांनी संचारबंदी असतानाही खंडाळा ते महाबळेश्वर प्रवास केल्याची धक्कादायक माहितील समोर आली असून यासाठी विशेष गृह सचिव अमिताभ गुप्ता यांच्या पत्राद्वारे त्यांना परवानगी मिळाल्याचे समजते. ही बाब उघड झाल्यानंतर सरकारवर विरोधकांनी चहू बाजूंनी प्रश्नांचा भडिमार केला. अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विशेष गृह सचिव अमिताभ गुप्ता यांना वाधवान प्रकरणी चौकशी पूर्ण होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. अनिल देशमुख यांनी रात्री दोन वाजत या संदर्भात ट्विटरवरून माहिती दिली.
Maharashtra Principal Secretary (Special), Amitabh Gupta (who allegedly gave permission letter to Wadhavan family) has been sent on compulsory leave with immediate effect, till the pending of inquiry, which will be initiated against him: Home Minister Anil Deshmukh https://t.co/iFQHidM262 pic.twitter.com/Qm1PXBrv05
— ANI (@ANI) April 10, 2020
‘गुड फ्रायडे’वर कोरोनाचे सावट
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माहिमचे चर्च बंद करण्यात आले आहे.
Mumbai: St. Michael’s Church in Mahim remains closed on #GoodFriday today, as mass gatherings have been suspended at the Church in view of Coronavirus. #Maharashtra pic.twitter.com/YoNJRnvyqb
— ANI (@ANI) April 10, 2020
नागपुरात कोरोना बाधितांचा आकडा सहाने वाढला आहे. नागपुरात आता कोरोनाबाधितांची संख्या २५ झाली आहे, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत एकूण ३८१ बाधित क्षेत्र
मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या ७०० च्या घरात पोहोचलेली असून ज्या भागांमध्ये कोरोनाग्रस्त आढळून आलेले आहेत, त्या भागांना बाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. मुंबईत एकूण ३८१ क्षेत्र बाधित म्हणून जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये डी विभागात सर्वाधिक बाधित क्षेत्र असून या विभागात ४९ बाधित क्षेत्र आहेत. के-पश्चिम : ४१, ई विभाग : ३३ एम-पश्चिम : २४, एम-पश्चिम : २४ बाधित क्षेत्र घोषित केली आहे.
वॉर्ड नुसार बाधित क्षेत्रांची संख्या
- ए विभाग : ०३
- बी विभाग : ०३
- सी विभाग : ०५
- डी विभाग : ४९
- ई विभाग विभाग: ३३
- एफ –दक्षिण विभाग : ११
- एफ- उत्तर विभाग: ०५
- जी-दक्षिण विभाग: १५
- जी-उत्तर विभाग : ०५
- एच-पूर्व विभाग: ०९
- एच-पश्चिम विभाग: १४
- के-पूर्व विभाग: २०
- के-पश्चिम विभाग: ४१
- पी-दक्षिण विभाग: ०९
- पी-उत्तर विभाग : २३
- आर-दक्षिण विभाग : १३
- आर-मध्य विभाग : ११
- आर-उत्तर विभाग : ०५
- एल विभाग : १८
- एम-पूर्व विभाग: २४
- एम-पश्चिम विभाग: २४
- एन विभाग : १६
- एस विभाग : २३
- टी विभाग : ३
गृह विभागाच्या विशेष प्रधान सचिवांवर कारवाई
देशात लॉकडाऊन असताना देखील ‘डीएचएफएल’चे कपिल वाधवान यांच्यासह २३ जण सुट्टी घालवण्यासाठी महाबळेश्वरला गेल्याचे प्रकरण समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे राज्याच्या गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी वाधवान कुटुंबीयांना महाबळेश्वरला जाण्यासाठी परवानगी दिल्याचे उघड झाले आहे. यावरून विरोधी पक्षाने सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.
जगभरात ८८ हजार ९८१ जणांचा मृत्यू
कोरोनामुळे जगभरात आतापर्यंत ८८ हजार ९८१ जणांचा मृत्यू झाला असून १९२ देशांमधील १५ लाख १९ हजार २६० जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी तीन लाख १२ हजार १०० जण उपचारांनंतर बरे झाले आहेत. युरोपमध्ये सात लाख ८७ हजार ७४४ जणांना लागण झाली असून आतापर्यंत ६२ हजार ४०२ जणांचा मृत्यू झाला आहे.
मालेगावमध्ये आणखी पाच कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.
नाशिकमध्ये आत्तापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १२ वर गेली आहे. त्यात एकाचा मृत्यू झाला आहे. मालेगावमध्ये एकूण ९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर नाशिक शहरात दोघांवर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.