राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यादरम्यान प्रत्येक जीवानाश्यक वस्तूंची भाववाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमंडले आहे. मागणीच्या तुलनेमध्ये आवक कमी होत आहे. यामुळे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. तसेच भाजीपाल्यासह डाळींचा तुटवडा निर्माण झाल्याने जीवनावश्यक वस्तूचे भाव गगनाला भिडले आहेत. म्हणूनच जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
किरकोळ मार्केटमध्ये १६० ते १८० रुपये प्रतिकिलो हिरवा वाटणा झाला असून ८० ते १०० रुपयचे प्रतिकिलो शेवगा शेंगांसह फरसबी विकली जात आहे. सप्टेंबरमध्ये मुंबईतील भाजीपाला मार्केटमध्ये ५०० ते ६०० पेक्षा जास्त वाहनांमधून कृषी माल विक्रीसाठी येत होता. पण सध्या ४०० ते ४५० वाहनांचीच आवक होत आहे.
जाणून घ्या भाजीपाल्यासह डाळींचे दर
वस्तू ७ सप्टेंबर (एपीएमसी) ७ ऑक्टोबर (एपीएमसी) ७ ऑक्टोबर (किरकोळ)
वाटाणा ९० ते ११० १०० ते १४० १६० ते १८०
शेवगा शेंग ४५ ते ५५ ५० ते ६० ८० ते १००
कांदा १३ ते २३ २८ ते ४० ५० ते ६०
बीट १६ ते २४ २८ ते ३६ ५० ते ६०
फरसबी २६ ते ३६ ६० ते ७० ८० ते १००
आले ३० ते ५० ४५ ते ६० ६० ते ८०
फ्लॉवर २० ते २४ २५ ते ३५ ८० ते १००
मूगडाळ ९५ ते १०० ९५ ते १०५ १०० ते १२०
चनाडाळ ५५ ते ६० ५८ ते ६५ ७० ते ७५
उडीदडाळ ७० ते ९० ७५ ते ०५ ९० ते १००
तूरडाळ ८० ते ९० ८५ ते ९५ ९० ते १२०
मसूर डाळ ६० ते ६५ ६३ ते ६८ ८० ते ९०
भाजीपाल्यासह डाळींचे दर वाढण्याचे नेमके कारण…
राज्यात सप्टेंबर महिन्यांच्या अखेरीस मुसळधार पाऊस पडण्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला. त्यामुळे मागणीप्रमाणे पुरवठा होत नाही आहे. तसेच राज्यात सर्वत्र बाजारपेठात जीवनावश्यक वस्तूंची आवक घटली आहे. त्यामुळे दर वाढू लागले आहेत. तसेच येत्या दिवसात बाजारभाव तेजीतच राहण्याची शक्यता आहे.