घरमहाराष्ट्रराज्यातील कोरोना मृत्यूंची संख्या घटली- ४६ जणांचा मृत्यू

राज्यातील कोरोना मृत्यूंची संख्या घटली- ४६ जणांचा मृत्यू

Subscribe

राज्यात ४६ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, ४५,४३५ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे.

राज्यात ३,७९१ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १७,२६,९२६ झाली आहे. राज्यात ९२,४६१ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ४६ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, ४५,४३५ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे.

राज्यात ४६ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई १९, ठाणे १, नवी मुंबई मनपा ३, पनवेल मनपा १, नाशिक २, नंदुरबार २, पुणे १, सोलापूर ४, सातारा १, सांगली ४, सिंधुदूर्ग १, लातूर १, उस्मानाबाद १, बीड ३ आणि नागपूर २ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या ४६ मृत्यूंपैकी ३७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ४ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ४ मृत्यू लातूर १, रायगड १, सातारा १ आणि सोलापूर १ असे आहेत. मृत्यू रिकंसिलिएशन प्रक्रियेमध्ये राज्याच्या प्रगतीपर मृत्यूसंख्येत पूर्वीच्या ६४ मृत्यूंचा समावेश झाल्याने राज्याची मृत्यू संख्या ६४ ने वाढली आहे.

- Advertisement -

आज १०,७६९ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत एकूण १५,८८,०९१ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.९६ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९५,३६,१८२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७,२६,९२६ (१८.११ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १०,११,००४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,९८० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -