घरमुंबई'हे' आहेत यंदाचे ध्यास सन्मान पुरस्काराचे मानकरी

‘हे’ आहेत यंदाचे ध्यास सन्मान पुरस्काराचे मानकरी

Subscribe

गेली १५ वर्षे समाजात निरलस वृत्तीने काम करणाऱ्या लोकांचा शोध घेऊन त्यांचे कार्य समाजापुढे आणण्याचे महत्त्वाचे काम 'अँड फिझ' या संस्थेच्या वतीने सातत्याने होत आहे. 'ध्यास सन्मान' पुरस्काराच्या माध्यमातून 'अँड फिझ'च्या वतीने समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कतृत्वान व्यक्तींचा गौरव केला जातो.

जिद्द आणि कतृत्वाच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन समाजात यशस्वी झालेल्या कतृत्वान व्यक्तींना गौरविण्यात येणारा यंदाचा ‘ध्यास सन्मान’ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. यावर्षी अनाथांचा सागर म्हणून ओळखले जाणारे सागर रेड्डी, तालयोगिनी योगिता तांबे आणि अनघा मोडक यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. गेली १५ वर्षे समाजात निरलस वृत्तीने काम करणाऱ्या लोकांचा शोध घेऊन त्यांचे कार्य समाजापुढे आणण्याचे महत्त्वाचे काम ‘अँड फिझ’ या संस्थेच्या वतीने सातत्याने होत आहे. ‘ध्यास सन्मान’ पुरस्काराच्या माध्यमातून ‘अँड फिझ’च्या वतीने समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कतृत्वान व्यक्तींचा गौरव केला जातो. येत्या ७ नोव्हेंबर रोजी ‘अँड फिझ’ प्रस्तुत ‘गगन सदन तेजोमय’ या दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात रविंद्र नाट्य मंदिरमध्ये पहाटे ६.४५ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात ‘ध्यास सन्मान’ पुरस्काराचे वितरण होणार आहे. या पुरस्कार सोहळ्यास विजय केंकरे, अतुल परचुरे, जितेंद्र जोशी, समीर चौगुले, स्पृहा जोशी, अजित परब, केतकी भावे,नचिकेत लेले, प्रियांका बर्वे, अर्चिस लेले, विजय जाधव, महेंद्र शेडगे, महेश खानोलकर, राहुल देव, वरद कठापूरकर, अमित गोठीवरेकर, कमलेश भडकमकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाची संकल्पना विनोद पवार यांची असून गनन सदन तेजोमय चे संयोजन महेंद्र पवार यांनी केले आहे.

पुरस्काराचे पहिले मानकरी सागर रेड्डी

नवी मुंबईच्या एकता निराधार संस्थेचे सागर रेड्डी यांना अनाथांचा सागर म्हणून ओळखले जाते. आई-वडिलांच्या प्रेमविवाहला समाजाने विरोध केला होता. या विरोधामध्ये त्यांची हत्या देखील करण्यात आली. परंतु, सुदैवाने ३ महिन्यांचा सागर यातून वाचला. त्याच्या जिवाला धोका नको म्हणून त्या लहानग्या बाळाला आजोबांनी लोणावळ्याच्या अनाथाश्रमात ठेवलं. अठरा वर्षांनी तिथून बाहेर पडायला लागल्यावर हाती शून्य असलेलेल्या सागरने जगण्याचे चटके सोसले. शिक्षणाची आस होती, एका भल्या माणसाने त्याला इंजिनीयर होण्यासाठी सारी मदत केली. उत्तम नोकरी होती, हातात पैसा आला होता. पुढचे आयुष्य सुखात जाऊ शकले असते, मात्र सागर आपल्या सहकाऱ्यांना भेटायला अनाथाश्रमात गेला आणि त्याच्या जीवनाचे ध्येय बदलले. अनाथांचा तो नाथ झाला. ३०-४० करत हजारावर अनाथांना त्याने मदतीचा हात दिला. त्यांना निवास, अन्न, शिक्षण व संसार यासाठी आपली मिळकत लावली. त्याचा हा यज्ञ चालूच आहे.

- Advertisement -

पुरस्काराचे दुसरे मानकरी योगिता मोरे

दुसऱ्या ‘ध्यास सन्मान पुरस्कार’ विजेत्या योगिता मोरे या दहावीपर्यंत थोड्याफार प्रमाणात पाहू शकत होत्या. दहावीत घाईत अपघाताने, अंघोळी वेळी पडलेला साबण उचलताना त्यांच्या उजव्या डोळ्यात नळ घुसला. खूप रक्त गेलं. दुर्दैवानं त्यात त्यांची दोन्ही डोळ्यांची दृष्टी पूर्ण गेली. ताल हा लहानपणापासून त्यांच्या नसात भिनलेला होता. आपल्या दृष्टीहीनतेवर मात करत त्या आज ५० हून अधिक वाद्य वाजवतात. इतकंच नाही, त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केलंय. त्या आता मुलांना वादन शिकवतात. अनेक पुरस्कार त्यांना मिळालेत. असामान्य कर्तृत्व म्हणजे काय याचा त्या आदर्श आहेत.

पुरस्काराचे तिसरे मानकरी अनघा मोडक

तिसऱ्या ध्यास सन्मान पुरस्कार विजेत्या वयाच्या पंचविशीपर्यंत सुदृढ आयुष्य जगणाऱ्या, निसर्गात रामणाऱ्या, रंगांची आवड असणाऱ्या अनघा मोडक याना डेंग्यूचं निमित्त झालं आणि दृष्टी निकामी झाली. रुपा रेल महाविद्यालयामधून पदवी, मासमीडिया कोर्स, रेडिओवर निवेदक, कार्यक्रमांचं निवेदन या साऱ्यावर अचानक लगाम लागला. मात्र हार न मानता अनेकांच्या प्रोत्साहनाने अनघा आजही निवेदनाची कामे करतात. एका चॅनेलवर त्यांनी अशाच शारीरिक अभावग्रस्त, दिव्यांग व्यक्तींच्या मुलाखतीची मालिका केली. आयुष्यात खाचखळगे येतात, त्यांना डगमगून न जाता आपण पुढे जात राहिलं पाहिजे, कारण आयुष्य खूप सुंदर आहे, असं त्या सहज बोलून जातात.

- Advertisement -

हेही वाचा – पंतप्रधान मोदींना सोल शांतता पुरस्कार जाहीर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -