घरमुंबईजखमी अवस्थेत रस्त्यावर टाकून मित्र गेला पळून

जखमी अवस्थेत रस्त्यावर टाकून मित्र गेला पळून

Subscribe

जीवलग मित्रानेच केला घात

जीवलग मित्रानेच घात केल्यामुळे वसईतील तरुण विद्यार्थ्याला आपला जीव गमावावा लागल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री महामार्गावर घडली. मुंबई-अहमदाबाद महामार्गाजवळील सातीवली येथे मध्यरात्री दीडच्या सुमारास एक तरुण जखमी अवस्थेत दिसून आला. त्याच्या जखमी होण्याला त्याचा जीवलग मित्रच जबाबदार असल्याचा आरोप होत आहे.

भर पावसात हा जखमी तरुण रात्रीच्या वेळी येणार्‍या जाणार्‍यांना हाक देत होता. त्यावेळी जमलेल्या लोकांनी त्याची चौकशी करून व्हिडिओ तयार केला. त्याचवेळी त्याच्या घरच्यांशी आणि पोलिसांशी संपर्क साधून त्याला प्लॅटीनम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, तोपर्यंत जबरदस्त रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याची प्राणज्योत मालवली होती. लक्ष्मण राजपुरोहित असे या दुर्देवी तरुणाचे नाव आहे. तो वसईच्या आनंद नगरात रहात होता.

- Advertisement -

घटनास्थळी जमलेल्या लोकांनी मदत करतानाच काढलेल्या व्हिडिओमुळे या अपघाताची वेगळीच कहाणी समोर आली आहे. लक्ष्मणच्या मृत्यूला बालपणीचा जीवलग मित्रच कारणीभूत असल्याचे लक्ष्मणने जखमी अवस्थेत सांगितले. लक्ष्मण आणि त्याचा बालपणीचा मित्र शैलेश गुप्ता हे महामार्गावर रात्री जेवायला गेले होते. तिथून रात्री दीड वाजता घरी परतत असताना लक्ष्मण गंभीर जखमी अवस्थेत लोकांना दिसला. शैलेश गुप्ता मला कट मारून इथे सोडून गेला. असे लक्ष्मणने व्हिडिओत सांगितले. त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्याऐवजी जखमी अवस्थेत सोडून शैलेश घरी पळून गेला. शैलेशनेच त्याचा घात केल्याचे लक्ष्मणने स्पष्ट केले असताना त्याच्या पालकांनीही हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. वालीव पोलिसांनी या घटनेची अपघाती नोंद केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -