घरविधानसभा २०१९'आम्हाला ईडीची गरज नाही'

‘आम्हाला ईडीची गरज नाही’

Subscribe

'आम्हाला ईडीची गरजच नाही', असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

‘आम्ही लहान लोकांशी लढत नाही. आम्ही लहान मुलांशी लढत नाही. खरं आहे पवार साहेब आम्ही लहान आहोत. पण एक गोष्ट तुम्हाला विचारतो. पाच वर्ष पदोपदी तुम्ही आमच्याशी बरोबरी केली. पण, आम्ही तुमच्याशी लढलो. मात्र, ही लहान मुलांनीच तुमच्या पक्षाला चारी मुंड्या चित्त केल आहे. काही लोक नख कापून जखमी झाल्याचा आव आणतात. नख कापून शहीद झाल्याचा आव आणतात आणि म्हणतात आम्ही ईडीला घाबरत नाही. पण आम्हाला ईडीची गरजच नाही’, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजप-शिवसेना महायुतीची संयुक्त प्रचारसभा मुंबईतील वांद्रे येथे आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.

‘पवारांची अवस्था ‘शोले’ मधील जेलरसारखी’

भारतीय जनता पक्षात येण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांची रांग लागली होती. त्यातील महत्त्वाच्या लोकांना आम्ही घेतल्यानंतर उर्वरित नेतेही आमच्या पाठीमागे लागले होते. परंतू, त्यांना आम्ही नकार दिला. त्यामुळे राष्ट्रवादीत बोटावर मोजण्याएवढी लोकं तरी राहू शकली. अर्थात, जे पहिलवान राष्ट्रवादीत आहेत, त्यांच्यातही आपापसांत लढती होत असतात. त्यामुळे शरद पवारांची अवस्था सध्या शोले चित्रपटातील जेलरसारखी झाली आहे. आधे इधर आधे उधर बाकी मेरे पिछे… असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मुंबईमधील सभेत लगावला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – शरद पवारांची अवस्था शोलेतील जेलरसारखी; ‘आधे इधर, आधे उधर..’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -