घरताज्या घडामोडीकोरोना मुक्तीसाठी पंढरीच्या पांडुरंगाला गृहमंत्र्यांचं साकडं

कोरोना मुक्तीसाठी पंढरीच्या पांडुरंगाला गृहमंत्र्यांचं साकडं

Subscribe

आषाढी एकादशीची वारी आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व आरोग्य व्यवस्था पाहणी करता गृहमंत्री अनिल देशमुख आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पंढरपूरला भेट दिली.

आषाढी एकादशीची वारी आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व आरोग्य व्यवस्था पाहणी करता गृहमंत्री अनिल देशमुख आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पंढरपूरला शनिवारी भेट दिली. महाद्वार चौकातून दर्शन घेताना गृहमंत्र्यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाला साकडं घातलं “विठू माऊली तू माऊली जगाची, आर्त साद तुज ही कोरोना मुक्तीची’, असे म्हणत विठुरायाला साकडं घातलं. ‘संपूर्ण जग, भारत आणि महाराष्ट्रातून या कोरोनाला घालव आणि शतकांपासून चालत आलेली वारीची परंपरा पूर्ववत लवकरच चालू होण्यासाठी आशिर्वाद असू द्या’, असे म्हणत विठुरायाला नमस्कार केला. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार भारत भालके आदि उपस्थित होते.

काय म्हणाले गृहमंत्री?

पांडुरंगाच्या दर्शनानंतर गृहमंत्र्यांनी जनतेला आवाहन केले की, पालखी सोहळ्याबाबत शासनस्तरावर घेण्यात येणारा निर्णय नागरिक आणि भाविकांच्या हिताचा असेल. त्या निर्णयाबाबत भाविकांनी आणि जनतेने सहकार्य करावे. भाविकांनी घरातूनच नामस्मरण आणि पूजा करावी

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी आणि जनतेने आरोग्याच्या दृष्टीने पंढपुरात येऊ नये. घरातूनच श्री विठ्ठलाचे नामस्मरण आणि पूजा करावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीच्या अनुषंगाने सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी गृहमंत्र्यांना दिली. या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, अतिरिक्त पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, प्रांताधिकारी सचिन ढोले, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी आदी उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा – महाराष्ट्रात आजपासून पुन्हा सलून सुरु; ‘या’ नियमांचे करावे लागणार पालन


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -