घरमहाराष्ट्रफडणवीसांच्या मिठाला जागणार्‍यांच्या बदल्या

फडणवीसांच्या मिठाला जागणार्‍यांच्या बदल्या

Subscribe

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या मिठाला जागणार्‍या काही अधिकार्‍यांची बदली केली, असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला आहे. ठाकरे सरकारकडून पोलूस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. राज्यातील 40 हून अधिक वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

कोरोना काळात अधिकार्‍यांच्या बदलीचे सत्र सुरू असल्याने सरकारवर टीका केली जात आहे. काही अधिकारी फडणवीस सरकार काळातील ते खाल्या मिठास जगात होते. यामुळेच त्यांना बदलले, अशी टीका मुश्रीफ यांनी अधिकार्‍यांचे नाव न घेता केली.

- Advertisement -

मंदिर-मशीद सुरू करावे म्हणून आंदोलन केले जात आहे; पण कोरोना संकट वाढत आहे, त्यामुळे बंद ठेवले, आता ई-पास काढला. लोक प्रवास करतील. मात्र, अजून कोरोनाची भीती आहे. काही दिवस लोकांनी थोडा संयम बाळगावा, असे हसन मुश्रीफ म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातोश्री, सह्याद्री येथून चांगले काम करत आहे. राज्यातील समस्या सोडवत आहे. विरोधक विनाकारण सीएम यांना बदनाम करत आहेत, असे मुश्रीफ म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -