घरताज्या घडामोडी'योगींनी त्यांचं राज्य सांभाळावं', गृहमंत्री अनिल देशमुखांनी टोचले कान!

‘योगींनी त्यांचं राज्य सांभाळावं’, गृहमंत्री अनिल देशमुखांनी टोचले कान!

Subscribe

गेल्या दोन दिवसांमध्ये उत्तर प्रदेशमध्ये बलात्काराच्या लागोपाठ तीन घटना (Rape Incidents in Uttar Pradesh) समोर आल्या आहेत. या घटनांमुळे देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हथरसमध्ये झालेल्या घटनेत तर उत्तर प्रदेश पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबाला तिच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा हक्क देखील नाकारत रात्रीच्या अंधारात तिच्यावर अंत्यसंस्कार केले. त्यामुळे उत्तर प्रदेशसोबतच देशभरातून या घटनांवर सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र सरकारवर राज्यातली गुन्हेगारी आणि राजकीय संभ्रमावस्था यावरून सातत्याने टीका आणि खडे बोल सुनावणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांना महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी परखड बोल सुनावले आहेत. ‘योगी आदित्यनाथ यांनी त्यांचं राज्य सांभाळावं’, असा सल्ला देखील अनिल देशमुखांनी दिला आहे.

काय म्हणाले अनिल देशमुख?

उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनांमुळे उत्तर प्रदेश सरकार टीकेच्या केंद्रस्थानी आहे. या घटनांवर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, ‘गेल्या काही महिन्यांमध्ये आपण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना इतर राज्यांना सल्ले देताना पाहिलं आहे. माझा त्यांना सल्ला आहे की त्यांनी त्यांच्या राज्याची काळजी करावी आणि तिथे सुरू असलेल्या जंगल राजवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर कारवाई करावी’, अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -