घरक्रीडाIND vs AUS : ब्रिस्बनमधील क्वारंटाईनचे नियम शिथिल करा; बीसीसीआयची मागणी 

IND vs AUS : ब्रिस्बनमधील क्वारंटाईनचे नियम शिथिल करा; बीसीसीआयची मागणी 

Subscribe

भारत आणि ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बन कसोटीला १५ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.  

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी ब्रिस्बन येथे होणार आहे. मात्र, क्वीन्सलँडमध्ये क्वारंटाईनचे नियम कडक असल्याने भारतीय संघ चौथी कसोटी ब्रिस्बनमध्ये खेळण्यास फार उत्सुक नाही. त्यामुळे चौथा कसोटी सामना ठरल्याप्रमाणे व्हावा असे वाटत असल्यास खेळाडूंसाठी क्वारंटाईनचे नियम शिथिल करण्यात यावेत, अशी मागणी करणारे पत्र बीसीसीआयने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला लिहिले आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होण्याआधी भारतीय संघाला १४ दिवस क्वारंटाईन व्हावे लागले होते. मात्र, दौऱ्याला सुरूवात झाल्यानंतर खेळाडूंना पुन्हा क्वारंटाईन व्हावे लागेल असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून आधी सांगण्यात आले नव्हते. ब्रिस्बनमधील क्वारंटाईनच्या नियमांनुसार, खेळाडूंना दिवसाचा खेळ संपल्यावर थेट त्यांच्या हॉटेल रूममध्ये जावे लागेल. त्यांना तेथून बाहेर पडता येणार नाही. मात्र, क्वारंटाईनचे हे कडक नियम बीसीसीआयला मान्य नाहीत. ‘ब्रिस्बनमध्ये सामना होणार असेल तर खेळाडूंसाठी क्वारंटाईनचे नियम शिथिल करण्यात यावेत याबाबतचे पत्र बीसीसीआयने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला पाठवले आहे,’ असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

- Advertisement -

‘दिवसाचा खेळ संपल्यावर खेळाडूंना स्वतःच्या रूममध्ये बसून राहावे लागणार आहे. मात्र, आयपीएल स्पर्धेदरम्यान खेळाडूंना एकमेकांच्या रूममध्ये जाऊन गप्पा मारण्याची, जेवायची परवानगी होती. आता अशीच परवानगी खेळाडूंना ब्रिस्बनमध्ये मिळावी अशी बीसीसीआयची मागणी आहे. ही मागणी फार मोठी असल्याचे मला वाटत नाही,’ असेही बीसीसीआयचा अधिकारी म्हणाला. तसेच क्वारंटाईनचे नियम शिथिल करण्यात येतील हे बीसीसीआयला क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून लेखी स्वरूपात हवे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -