घरताज्या घडामोडीमोदी सरकारची लसीकरणातील दिरंगाई तरुणांच्या जीवावर उठणारी, काँग्रेसचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

मोदी सरकारची लसीकरणातील दिरंगाई तरुणांच्या जीवावर उठणारी, काँग्रेसचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Subscribe

लशींचा साठा उपलब्ध नसल्याने देशस्तरावर एवढा मोठा कार्यक्रम ढेपाळण्यासाठी मोदी सरकार जबाबदार

देशात कोरोना प्रादुर्भावाच्या तिसऱ्या लाटेने हाहाकार घातला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशात लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा केली आहे. उद्यापासून म्हणजे १ मे पासून १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकर करण्याचे जाहीर केले आहे. सध्या ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरु आहे. केंद्राकडून लसीचा नियमित पुरवठा होत नसल्याने आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांनी १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण पुढे ढकलले आहे. यावरुन काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. लसीकरण केंद्र सरकारने जाहीर केले परंतु अत्यंत ढिसाळ आणि नियोजन शून्य मोदी सरकारने लशींचा पुरवठा न केल्याने हा कार्यक्रम देशपातळीवर सुरू होऊ शकणार नाही हे दुर्दैव असल्याचे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

केंद्रातील मोदी सरकारची लसीकरणातील दिरंगाई तरुणांच्या जीवावर उठणारी आहे. १ मे पासून १८ ते ४४ या वयोगटातील देशाच्या तरुण कार्यशक्तीचे लसीकरण केंद्र सरकारने जाहीर केले परंतु अत्यंत ढिसाळ आणि नियोजन शून्य मोदी सरकारने लशींचा पुरवठा न केल्याने हा कार्यक्रम देशपातळीवर सुरू होऊ शकणार नाही हे दुर्दैव आहे. जगात लसीकरण युध्दपातळीवर सुरू असताना व भारतात कोरोनामुळे मृत्यूचा तांडव चालला असताना ही मोदी सरकारची बेफिकिरी अपराधी प्रवृत्तीची आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही मध्यप्रदेशात लशींअभावी १ मेला लसीकरण सुरू होणार नाही असे स्पष्ट केले असल्याचे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

लशींचा साठा उपलब्ध नसल्याने देशस्तरावर एवढा मोठा कार्यक्रम ढेपाळण्यासाठी मोदी सरकार जबाबदार असताना भाजपा चे राज्यातील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सारखे नेते व भाजपा आयटी सेल मात्र राज्य सरकारला दोष देत आहे व अपप्रचार करत आहे. याला चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात. देशातील युवावर्गाची जबाबदारी मोदी सरकारने राज्यांवर ढकलली पण आता लसीकरणातील दिरंगाई ही तरुणाईच्या जीवावर उठणारी आहे.

- Advertisement -

ही दिरंगाई केवळ १८-४४ वयोगटात नाही. ४५ वर्षांवरील वयोगटातील लसीकरणही केंद्राने लशींचा पुरवठा नीट न केल्याने सातत्याने अडचणीत येत आहे. महाराष्ट्राला जाहीर केलेल्या ४३५००० रेमडेसीवीरपैकी केवळ २,३०,००० इंजेक्शन पाठवले. मोदी सरकार दिलेले शब्द पाळत नसेल तर राज्यांनी नियोजन कसे करावे? असा सवाल काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -