घरठाणेकल्याण तालुक्यात कोविड सेंटर पुन्हा सुरू होणार

कल्याण तालुक्यात कोविड सेंटर पुन्हा सुरू होणार

Subscribe

ठाणे जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केला विश्वास 

कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत त्यांच्यासाठी हक्काचे कोरोना कोविड सेंटर असावे, यासाठी कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि तालुका वैद्यकीय अधिकारी प्रयत्न करत आहेत. कोरोना पेंशट वाढत असल्याने कोविड सेंटर सुरू करण्याच्या हालचालीना वेग आला आहे, तर येत्या एक दोन दिवसात सेंटर्स सुरु होतील असा विश्वास ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केला आहे.
कल्याण तालुका हा अगदी उल्हासनगर, कल्याण डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ अशा  शहराजवळ असूनही मागील वर्षी कोरोनाच्या काळात तालुक्यातील नागरिकांना बेड मिळत नव्हते.  म्हारळ, वरप कांबा या परिसरातही रुग्ण संख्या वाढत होती. त्यानंतर कोविड सेंटर्स सुरू करण्यात आले. कल्याण तालुक्यात बुधवारी एकाच दिवशी तब्बल ९२ पेंशट सापडले आहेत. हा वेग लक्षात घेऊन तिसरी लाट आल्याचे हे संकेत मानून तालुक्यात कोरोना कोविड सेंटर सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याकरता कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भारत मासाळ यांनी पाहणी सुरू केली.
अशातच पूर्वीचे वरप येथील राधास्वामी कोरोना कोव्हिड सेंटरची जागा न देण्याचा निर्णय काही संचालकांनी घेतल्याने मोठी अडचण निर्माण झाली. त्यामुळे त्यांनी म्हारळ, वरप, कांबा, रायते, मामणोली आणि भिसोळ आदी ठिकाणी जागा बघितल्या. परंतु तेथे काहीना काही अडचणी असल्याने तेथे सेंटर चालू करणे अवघड आणि खर्चिक आहे. असे असल्याने तूर्तास तरी वरप येथेच कोरोना कोव्हिड सेंटर सुरू होईल अशी आशा वाटते, या संदर्भात ठाणे जिल्ह्याधिकारी राजेश नार्वेकर यांनी येत्या दोन तीन दिवसांत कल्याण तालुक्यासाठी कोरोना कोविड केअर सेंटर सुरू होईल असे सांगितले. तर राधास्वामी सत्संगचे संचालक राजेश लुल्ला यांना विचारले तर ते म्हणाले, आम्ही नेहमीच मदतीसाठी तयार असतो, मागील वर्षी आमच्या संस्थेने देशभरात बाराशे कोटी रुपयांची मदत केली असल्याचे सांगून याही वेळी नागरिकांची अडचण होऊ देणार नाही असे सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -