घरदेश-विदेशविधिमंडळ पक्षाच्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याप्रकरणी अशोक गेहलोत गटाच्या आमदारांना नोटीस, 10 दिवसांत...

विधिमंडळ पक्षाच्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याप्रकरणी अशोक गेहलोत गटाच्या आमदारांना नोटीस, 10 दिवसांत द्यावे लागणार उत्तर

Subscribe

जयपुर : राजस्थान काँग्रेसमधील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याप्रकरणी हायकमांडने गेहलोत गटाच्या तीन आमदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने मंगळवारी रात्री संसदीय कामकाज मंत्री शांती धारिवाल, व्हिप महेश जोशी आणि आरटीडीसीचे अध्यक्ष धर्मेंद्र सिंह राठोड यांना नोटीस बजावली आहे.

 राजस्थान काँग्रेस  राजकीय गोंधळाशी संबंधित महत्वाची माहिती –

  1. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे त्याला क्लीन चिट देण्यात आल्याचे मानले जात आहे. अशा परिस्थितीत गेहलोत हेच मुख्यमंत्रीपदी कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच गेहलोत यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या उमेदवारीवरूनही सस्पेन्स आहे. अजय माकन आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या अहवालात तिन्ही नेत्यांना अनुशासनहीनतेसाठी दोषी ठरवले आणि तिघांनाही 10 दिवसांत उत्तर देण्यास सांगितले.
  2. धारिवाल यांनी संसदीय कामकाज मंत्री असतानाही त्यांच्या घरी विधीमंडळ पक्षाच्या बैठकीला समांतर आमदारांची बैठक घेणे, व्यासपीठावरून सभेला संबोधित करणे आणि आमदारांना मिस-गाईड करणे अशा प्रकारचा गंभीर आरोप त्यांच्यावर झाला आहे. त्याचबरोबर महेश जोशी यांना दोन प्रकरणात शिस्तभंग केल्याप्रकरणी दोषी ठरवून नोटीस बजावण्यात आली आहे.
  3. मुख्य व्हीप असतानाही आमदारांना माहिती देऊनही विधीमंडळ पक्षाने त्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याचे नोटीसमध्ये लिहिले आहे. मग समांतर सभेत स्वतः सहभागी होण्याबरोबरच बाकीच्या आमदारांचीही मनधरणी करून गोंधळ घालण्याचे काम केले. मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आणि आरटीडीसीचे अध्यक्ष धर्मेंद्र सिंह राठोड यांना धारिवाल यांच्या घरी बैठकीचे नियोजन करण्यापासून सर्व व्यवस्था करण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे.
  4. राजस्थान काँग्रेसमध्ये दोन दिवसांपासून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दुपारी सुमारे 20 आमदार मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री भवनात पोहोचले होते. या बैठकीला राजकीय संकटाशी जोडले जात आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेणाऱ्यांमध्ये काही मंत्र्यांचाही समावेश होता.
  5. त्याचवेळी सचिन पायलट दिल्लीत पोहोचले आहेते. ते पक्ष हायकमांडला भेटू शकतात. पायलट सोनिया गांधी यांच्याशी बोलले आहेत. गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढविल्यास त्यांनी राजस्थानचे मुख्यमंत्रीपद सोडावे याबाबत त्यांचे बोलने झाले आहे, असा दावा वृत्तसंस्थेने दावा केला आहे. दरम्यान परंतु सचिन पायलट यांनी स्वत: ट्विट करून ही खोटी बातमी असल्याचे म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणावर पायलटने मौन बाळगले असून, ते मीडियासमोर कोणतीही प्रतिक्रिया देत नाहीत.
Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -