घरठाणेभिवंडीत महिलांना कायमस्वरुपी रोजगारासाठी प्रकल्प उभारणार

भिवंडीत महिलांना कायमस्वरुपी रोजगारासाठी प्रकल्प उभारणार

Subscribe

केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी महिलांचे सक्षमीकरण गरजेचे आहे. त्या दृष्टिकोनातून भिवंडी तालुक्यातील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून कायमस्वरुपी रोजगार मिळवून देण्यासाठी उत्तम प्रकल्प उभारण्याचा विचार केला जात आहे, अशी माहिती केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज येथे दिली. हिरकणीचा वारसदार असलेल्या महिलांनी आत्मविश्वासाने उद्योग व्यवसायात उतरून प्रगती करावी, असे आवाहन कपिल पाटील यांनी केले. भाजपा व कपिल पाटील फाऊंडेशनच्या वतीने माझ्या वाढदिवसानिमित्ताने कपिलोत्सव २०२३ हा सामाजिक महोत्सव साजरा केला जात आहे. त्यानुसार भिवंडी तालुक्यातील दाभाड येथे आयोजित केलेल्या महिला मेळाव्याला उपस्थित राहून महिला भगिनींना शुभेच्छा दिल्या, या वेळी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष देवेश पाटील, सिद्धेश पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष पी. के. म्हात्रे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा शीतल तोंडलीकर, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती श्रेया गायकर, माजी पंचायत समिती सभापती रवीना जाधव, श्रमजीवी संघटनेचे बाळाराम भोईर, अशोक सापटे आदींची उपस्थिती होती. या मेळाव्याला पाच हजारांहून अधिक महिलांची उपस्थिती होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला सक्षम झाल्या पाहिजेत, असा संदेश दिला आहे. त्यानुसार भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने तालुक्यातील एका तरी महिलेला कायमस्वरुपी रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा. तालुक्यातील कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी गटागटाने बैठका घ्याव्यात. महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी प्रेरणा द्यावी, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले. केंद्र सरकारतर्फे महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. त्याचा फायदा महिलांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली शहरात दूध व भाजीपाल्याला मोठी बाजारपेठ आहे. महाराष्ट्रातील २२ टक्के लोकसंख्या याच पट्ट्यात राहत आहे. त्यादृष्टीकोनातून भाजीपाला व डेअरी व्यवसाय करण्यासाठी प्रयत्न करावा. आगामी काळात भिवंडीतील महिला भगिनींना सक्षम करण्यासाठी कायमस्वरुपी उभारण्याचा प्रयत्न आहे. महिलांनी मेहनत केल्यास त्यांना सहजपणे रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास कपिल पाटील यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

या वेळी महंत स्वामी चिंतानंद सरस्वती यांना ठाणे जिल्हा महंत भूषण, भगवान बाबुराव भोईर यांना ठाणे जिल्हा भजन भूषण पुरस्कार, सहकार क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व सुदाम हजारे, न्यायाधीश पदावर उत्तीर्ण रुणाली रंजना दयानंद पवार यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या वेळी आयोजित केलेल्या लकी ड्रॉमध्ये एका आदिवासी भगिनीला स्कूटीचे बक्षीस मिळाले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -