घरताज्या घडामोडीमुंबईकर करताहेत कोरोनावर मात; रिकव्हरी रेट ८२ टक्क्यांवर

मुंबईकर करताहेत कोरोनावर मात; रिकव्हरी रेट ८२ टक्क्यांवर

Subscribe

महाराष्ट्रातही कोरोनाचा धोका वाढला असला तरी मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मुंबईत कोरोनाचा रिकव्हरी रेट तब्बल ८२ टक्क्यांवर पोहोचला आहे. याचा अर्थ १०० मुंबईकरांना कोरोनाची बाधा होत असेल तर त्यातून ८२ मुंबईकर बरे होत आहेत. मात्र, अद्यापही कोरोनाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे मुंबईकरांनी सतर्क राहून आपल्या आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घेणे आवश्यक आहे.

देशात कोरोनाने थैमान घातले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 61,45,292 वर गेला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 96,318 लोकांना जीव गमवावा लागला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 70,589 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 776 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र, याच दरम्यान सातत्याने चिंताजनक आकडेवारी समोर येत आहे.कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून येत्या काही दिवसांत कोरोनाचा धोका कायम असल्याची माहिती आता समोर आली आहे. सध्या सण-समारंभाचे दिवस आहेत. त्यामुळे या काळात मास्क घालूनच सर्व सण साजरे करावेत, असा सल्ला केंद्र सरकारने नागरिकांना दिला आहे.

- Advertisement -

नीती आयोगाचे सदस्य आणि भारताच्या कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल यांनी कोरोनाचा अधिक संसर्ग होऊ नये, यासाठी पुढील काही महिन्यांत आपल्याला मास्कवाली पूजा, मास्कवाली छटपूजा, मास्कवाली दिवाळी, मास्कवाला दसरा, मास्कवाली ईद साजरी करावी लागेल, असे म्हटले आहे.

केंद्र सरकारने दिला मोलाचा सल्ला
सण-समारंभ असल्याने लोक एकमेकांना भेटण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे अशा वेळी मास्क लावण्याचा आणि योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. इंडियन कौन्सिल मेडिकल रिसर्चने दुसरा राष्ट्रीय सीरो सर्व्हे जारी केला आहे.

- Advertisement -

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 17 ऑगस्ट ते 22 सप्टेंबरदरम्यान हे सीरो सर्व्हेक्षण करण्यात आले. यामध्ये 10 वर्षांहून अधिक वय असलेल्या लोकांमध्ये कोरोनाचा प्रसार 6.6 टक्के झाल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -