एका कुटुंबात करवा चौथच्या दिवशी धक्कादायक घटना घडली आहे. कुटुंबातील वादामुळे घरातील एका विवाहित तरुणाने गळफास लावून घेतला आहे. यामुळे पत्नी संगीताची रडून रडून खूप वाईट अवस्था झाली आहे. ही घटना उत्तर प्रदेशमधील झाशीच्या पोलीस ठाणे उल्दन क्षेत्रातील गावामधील पलरा येते घडली आहे.
नक्की काय घडले?
करवा चौथच्या दिवशी कुटुंबातील लोक शेतात गेले होते. घरात पती सचिन (वय २५) सोबत त्याची पती संगीता आणि आई होती. दुपारी १२ वाजल्याच्या सुमारास सचिन दुसऱ्या मजल्यावरच्या खोली गळफास लावून आत्महत्या केली. तेव्हा त्याची पत्नी संगीता घरात खाली करवा चौथची तयार करत होती. मग खूप वेळ झाला पण सचिन वरुन खाली आला नाही. त्यामुळे तिला चिंता वाटू लागली. मग तिने वरती जाऊन पाहिले तेव्हा पतीचा देह लटकलेला पाहिला. हे पाहून ती जोरजोरात ओरडू लागली. त्यामुळे आजूबाजूचे लोक जमा झाले. तसेच कुटुंबातील लोक देखील शेतातून घरी आले. त्याला त्वरित खाली उतरवून आरोग्य केंद्रात नेले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मुलाच्या निधनाची बातमी ऐकून आईची अवस्था खूपच वाईट झाली. म्हातारपणी तिचा सहारा निघून गेला होता.
प्रधान सुदीप सिंह म्हणाले की, ‘तीन वर्षांपूर्वी सचिनच्या वडिलांनी आत्महत्या केली होती. यानंतर सर्व घराची जबाबदारी सचिनवर आली. तो एकुलत एक मुलगा होता. तो शेतीशिवाय दुसरे काम करत नव्हता. तो वारंवार पत्नीशी भांडत असे.’
करवा चौथच्या दिवशी देखील दोघांचे भांडण झाले होते. यानंतर त्याने आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळी जाऊन तपास केला. कौटुंबिक कारणांमुळे त्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सचिनला सहा महिन्यांचा मुलगा आहे.
हेही वाचा – लघवी कुठून येते? हे शोधण्यासाठी मुलाने प्रायव्हेट पार्टमध्ये टाकली तार