घरताज्या घडामोडीखडसेंनी माझा छळ केला -अंजली दमानिया

खडसेंनी माझा छळ केला -अंजली दमानिया

Subscribe

माझा लढा हा भ्रष्टाचाराविरोधात होता. कोणत्याही एका व्यक्तिविरोधात नव्हता. मी नितीन गडकरी आणि छगन भुजबळ यांच्याविरोधातही लढले. पण एकनाथ खडसे यांनी जेवढा माझा छळ केला, तेवढा कोणी केला नसेल, असे सांगतानाच यापुढे कोणत्याही पत्रकार परिषदेत माझे नाव घेतले तर याद राखा, तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिला.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या दाव्याचं खंडन करतानाच खडसे यांच्याविरोधी विनयभंगाचा खटला संपलेला नसल्याचे स्पष्ट केले. आरोपपत्रच अजून दाखल झालेले नाही तर खटला संपला कसा? असा सवाल करतानाच खडसे याबाबत धांदात खोटं बोलत आहेत, असा दावा दमानिया यांनी केला. खडसे हे खूनशी प्रवृतीचे आहेत. मी भाजपचे नेते नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्याविरुद्धही लढले. पण खडसेंनी जेवढा छळ केला तेवढा कुणीच केला नसेल, असे त्या म्हणाल्या.

- Advertisement -

खडसेंनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी माझ्याबद्दल अश्लील वक्तव्य केले. वाट्टेल ते बोलले. त्यामुळे वाकोला पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात असे वक्तव्य शोभणारे नाही. त्यामुळे त्यांना धडा शिकवण्यासाठीच एफआयआर दाखल केला, असेही त्या म्हणाल्या. मी दाखल केलेल्या एफआयआरवर पुढे काहीही झाले नाही. त्याला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच कारणीभूत आहेत. या प्रकरणात फडणवीसांनी सोयीचे राजकारण केले. कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्यांबाबत राजकारणी असेच राजकारण करतात, असे त्या म्हणाल्या. खडसेंवरील विनयभंगाचा गुन्हा संपलेला नाही. तरीही कालही ते वृत्तवाहिन्यांवरून धांदात खोटे बोलले. त्यामुळे माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -