घरताज्या घडामोडीशाहू,फुले,आंबेडकरांचे विचारधारा घेऊनच पुढे जावं लागेल - शरद पवार

शाहू,फुले,आंबेडकरांचे विचारधारा घेऊनच पुढे जावं लागेल – शरद पवार

Subscribe

फुले-आंबेडकरांचा आपल्याला मिळालेला वारसा जतन करण्यासाठी त्यांचे विचार नव्या पिढीत रुजवणं अत्यंत आवश्यक आहे. त्या दृष्टीची मानसिकता तयार करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. तोच विचार देशाला पुढे नेऊ शकतो, असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढले. पवार यांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित अभिष्टचिंतन कार्यक्रमात पवार बोलत होते.

माणसाला वय मिळतं, ते वाढत जातं ,जी विचारधारा आपण स्वीकारली. जे सूत्र स्वीकारलं त्या मार्गानं जाण्याचं काम करायचं असतं. सार्वजनिक जीवनात आपण सगळे काम करतो. शेवटच्या माणसाच्या हितासाठी तुम्ही लक्ष देता, तेव्हा तिथं तुम्हाला समजतं, पुढचा रस्ता कोणता असला पाहिजे ही स्पष्टता येते. जागृत राहून समाजकारण करण्याची संकल्पना राबवली पाहिजे. मी ५० वर्षांपासून राजकारणात काम करतोय. ही संधी महाराष्ट्रातल्या जनतेनं दिली म्हणून इथपर्यंत येता आलं, असे कृतज्ञापूर्वक उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख, देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काढले. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पवार म्हणाले; मी ५० वर्षांपासून राजकारणात काम करतोय. ही संधी महाराष्ट्रातल्या जनतेने दिली म्हणून इथपर्यंत येता आलं. इथपर्यंत पोहोचवणार्‍या जनतेचा मी आभारी आहे, असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांची पिढी घडवण्याचं आवाहन केलं.

- Advertisement -

आपल्या आई-वडिलांच्या आठवणीत जाताना पवार म्हणाले; स्वातंत्र्यपूर्व काळात गांधी-नेहरू विचारांची पताका घेऊन काम केलं पाहिजे, हे त्या मातेने स्वीकारलं आणि कुटुंबाची जबाबदारीही स्वीकारली. तिचा दृष्टिकोण आम्हाला महत्त्वाचा ठरला. ज्यांनी हे विचार दिले त्यांचं स्मरण करणं हे प्रत्येकाचं आद्य कर्तव्य असल्याचं पवार म्हणाले. सार्वजनिक जीवनात आपण विविध कामं करत असतो. जिथे शेवटच्या स्तरातील माणसाची जपणूक होते तिथे खूप काही शिकायला मिळते. पुढचा रस्ता काय असला पाहिजे, याची जाणीव होते. म्हणूनच जागरूक राहून समाजकारण केलं पाहिजे, असं पवार यांनी स्पष्ट केलं. अनेकांनी फुले-आंबेडकरांचा उल्लेख केला. सगळ्यांनी आपल्या नेतृत्वातून दृष्टी दिली. आज त्यांच्या नावाचा नुसता उल्लेख करून चालणार नाही. त्यांनी दिलेल्या दृष्टीतून समाज मानसिकता तयार करण्याची जबाबदारी घ्यावी लागेल. जी दृष्टी आपल्याला मिळाली त्या दृष्टीची मानसिकता तयार करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. तोच विचार देशाला पुढे नेऊ शकतो, असं शरद पवार म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -